उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव। तालुक्यातील मुरली सहश्रकुंड गावाजवळ पैनगंगा नदी वर बंधारा आहे मात्र या बंधाऱ्यात पाणी च नसल्याने नोव्हेंबर महिन्यात या परिसरातील गावाला पाणी टंचाई निर्माण झाली आहे या पाण्यावर शेतकरी रब्बी हंगाम मध्ये गहू ज्वारी हरभरा पीक घेतात मात्र शेतकऱ्याने यावर्षी अतिवृष्टी मुळे खरीप पीक वाया गेला कस तरी आशा होती रबी हंगाम घ्यावा मात्र रबी हंगाम पासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे तालुक्यातील बंदीभागातील लोकांना नदीपात्रात पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे इसापूर धरणाचे पाणी सहश्रकुंड पर्यत सोडावे अशी मागणी शेतकरी करत आहे रब्बी हंगाम घेण्यापूर्वी नदी कोरडी पडल्याने शेतकरी चिंतेत आहे पाणी सहश्रकुंड पर्यत सोडावे अशी मागणी आता शेतकरी आणि परिसरातील लोक मागणी करत आहे
Users Today : 23