ग्रामसेवक (ग्राम विकास अधिकारी) हा महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करत असतो.
ही दोन्ही पदे असणारे कर्मचारी ही जनतेची कामे करण्यासाठी शासनाने नेमलेले सेवक असतात.
गावातील लोक मात्र तलाठी आणि ग्रामसेवक असणाऱ्या व्यक्तीला रावसाहेब, आण्णासाहेब अशा नावाने संबोधित असतात.
अशा उपाधी देणे आधी बंद करा. ते आपल्याच कामासाठी नेमलेले जनतेचे नोकर आहेत त्यांना डोक्यावर घेणे बंद करा. त्यांना त्यांच्या नावाने हाक मारा.
तुम्ही मालक आहात ही भावना सामान्य लोकांत जागृत होणे गरजेचे १५-१५ दिवस हे कर्मचारी लोकांच्या कामासाठी उपलब्ध नसतात. लोकांची कामे अडून राहतात.
त्यांना एका किरकोळ कामाकरिता अनेक फेऱ्या मारायला लावल्या जातात.
यांचा पगारही सामान्य जनतेच्या करातून यांना मिळतो. लोकहो जागृत व्हा आपण मालक आहोत आणि हे आपले सेवक आहेत.
सेवकांना आजवर डोक्यावर घेतल्याने ते आपली पिळणवूक
करीत आहेत. हे बंद झाले पाहिजे.
पुन्हा एकदा सांगतोय जनता मालक आहे,
म्हणजेच तुम्ही मालक आहात आणि हा कर्मचारी तुमचा सेवक
Users Today : 16