कोयनेच्या पाण्यावरुन राजकारण पेटले,सांगलीच्या खासदारांचा शंभूराज देसाईंवर दमबाजीचा आरोप, शाहांकडे तक्रार करणार

Khozmaster
3 Min Read

सांगली : सांगलीच्या पाण्यावरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात वाद चिघळला आहे. पाण्यावरुन राजकारण चांगलेच पेटले आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आडमुठी भूमिका घेऊन सांगली जिल्ह्यावर अन्याय केला आहे. मसुदा समिती मध्ये घेतलेल्या ठरावावर सही न करता शंभूराज देसाईंनी अधिकाऱ्यांना दमबाजी करत चुकीची भाषा वापरल्याचा आरोप सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर शंभूराज देसाई यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहे. यामध्ये सुधारणा झाली नाही तर खासदारकी पणाला लावू ,वेळप्रसंगी खासदरकीचा राजीनामा देणार असल्याचा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने कृष्णा नदी दुसऱ्यांदा कोरडी पडली आहे. यावरून आता राजकरण चांगलेच पेटले आहे. भाजपचे सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडत मंत्री शंभूराज देसाई याच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी बोलताना संजयकाका पाटील म्हणाले, सांगलीत कोयनेच्या पाणी प्रश्नावरून कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत काही ठराव करण्यात आले. त्या ठरावावर सांगली, कोल्हापूर, सोलापूर च्या पालकमंत्र्यांनी सही केली. मात्र, साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी आडमुठी भूमिका घेत त्यावर सही केली नाही.सांगली जिल्ह्याला वेठीस धरण्याची भूमिका घेऊन राजकारण करत आहेत का ? याबाबत आम्हाला शंका आली. पाटबंधारे विभागाचे अधिकारी त्यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना आरेरावीची भाषा वापरून अधिकाऱ्यांना दमबाजी केली. आम्ही आमच्या हक्काचे पाणी मागत आहे आमही भीक मागत नाही. साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी आडमुठी भूमिका घेतली याचा आम्ही निषेध करत आहोत. याची तक्रार आम्ही केंद्रातील अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. घाणेरडे राजकारण आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. कोयना धरण तुमच्या मालकीचे आहे का? आमच्या हक्काचे पाणी आहे, कोणी दान आणि भीक देत नाही, असंही संजयकाका पाटील म्हणाले.

खासदारकी पणाला लावून वेळप्रसंगी खासदरकीचा राजीनामा देणार : संजयकाका पाटील

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाणी सोडण्याबाबतचे त्याचबरोवर इतर अधिकार तातडीने काढून घेण्यात यावेत. इथून पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश द्यावेत. याबाबत शंभूराज देसाई यांनी हस्तक्षेप करू नये. कोयना धरण काय त्यांच्या मालकीचे केले नाही. वेळप्रसंगी खासदारकी पणाला लावून तक्रार करूनही यांच्यात सुधारणा झाली नाही तर खासदरकीचा राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, माझे कोणत्या दलालीचे धंदे नाहीत, माझे बदल्यांवर काम चालत नाही असा टोलाही त्यांनी देसाई यांना लगावला आहे.दरम्यान, कोयना धरणातून सांगली जिल्ह्यासाठी दोन टीएमसी पाणी काल रात्री सोडण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली होती.

0 8 9 4 6 2
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *