शेतकरी आक्रोश मोर्चाच्या प्रवासात भेटलेल्या हजारो शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकऱ्याचे जीवन उध्वस्त होत असल्याची खंत बोलून दाखवली. त्यांच्या मनातील असह्य वेदना बोलण्यातून जाणवल्या.
दुष्काळ व अतिवृष्टीच्या संकटातून जीवापाड जपलेल्या पीक जोमात आल्यानंतर कांदा निर्यात बंदीच्या तुघलकी निर्णयाने निर्णयाने मोदी सरकारने नाकेबंदी केली. हा निर्णय तातडीने रद्द करावा अशी कळकळीची विनंती केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा, आपल्या मागणीचा सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करेल हीच अपेक्षा.
Users Today : 27