इंदुरीकर महाराजांचे ते 5 वादग्रस्त वक्तव्य पुन्हा चर्चेत; महिलांची चपलीशी तुलना ते “दिव्यांग मुलं होतील”पर्यंत अनेक प्रश्नचिन्हं

Khozmaster
3 Min Read

संगमनेर  विशेष प्रतिनिधी ;-

कीर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज सध्या त्यांच्या लेकीच्या भव्य साखरपुड्यामुळे जोरदार टीकेच्या केंद्रस्थानी आहेत. साधेपणाचा उपदेश आणि प्रत्यक्षातील विलासी कार्यक्रम यातील विरोधाभासावरून त्यांच्यावर प्रश्नचिन्हे उपस्थित होत असताना, त्यांच्या पूर्वीच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खालील पाच विधानांनी राज्यभरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडवली होती.


1) “माझ्या व्हिडिओ क्लिप्स यूट्यूबवर टाकण्याऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील”

किर्तनातील आर्थिक व्यवहारांवरून नाराजी व्यक्त करताना इंदुरीकर महाराजांनी हे वक्तव्य केले.
त्यांनी आरोप केला की:

  • त्यांच्या व्हीडिओंवरून हजारो लोकांनी कोट्यवधी रुपये कमावले

  • हे व्हिडिओ टाकणाऱ्यांना त्यांनी थेट “दिव्यांग मुलं जन्माला येतील” असे शापासदृश विधान केले

हे वक्तव्य समाजात तीव्र संतापाचे कारण ठरले.


2) स्त्री-पुरुष संबंधांबाबतचे वादग्रस्त विधान

इंदुरीकर महाराजांनी लैंगिक संबंध आणि तिथीनुसार मुलगा-मुलगी जन्मण्याचे वक्तव्य केले होते:

  • “संग सम तिथीला झाला तर मुलगा, विषम तिथीला झाला तर मुलगी”

  • “अशीव वेळी संग झाला तर संतती ‘रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी’ होते”

वैज्ञानिक, सामाजिक आणि स्त्रीमानहानीकारक अशा विधानांवर थेट टीका झाली.


3) महिलांची चपलीशी तुलना

इंदुरीकर महाराजांचे हे विधान सर्वाधिक वादग्रस्त मानले जाते:

  • “लव्ह मॅरेज करणारी बायको नवऱ्याला नावाने हाका मारते… हा कमीपणा आहे.”

  • “बायकोनं एकेरी हाक मारली तर दात पाडणार नाही का?”

  • “चप्पल कितीही भारी झाली तरी गळ्यात घालतो का? बायकोने तिच्या मापात असावे.”

या विधानांवरून महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि वारकरी समुदायातील अनेकांनी निषेध व्यक्त केला.


4) “मोबाईलमुळे मुली बिघडतात”

शाळकरी मुलींवर अविश्वास दाखवणारे हे विधान रागाची ठिणगी बनले:

  • मुलींचे बॅग, पास आणि मोबाईल तपासण्याचा सल्ला

  • “तीन-तीन सिम असतात… दोन नंबरांना घरात रेंज नसते… मोबाईल घरात सायलेंट असतो”

मुलींचा अपमान करणाऱ्या या विधानाची शिक्षणतज्ज्ञांनी निंदा केली.


5) सर्व्हिसवाल्यांबाबत राहिलेले वक्तव्य

इंदुरीकर महाराजांनी वेतन आणि बुद्धी यांची तुलना करत म्हटले होते:

  • “कष्टाची ड्यूटी करणाऱ्यांना कमी पेमेंट. सर्व्हिसवाल्यांचे पेमेंट बुद्धीवर असायला हवे.”

  • “1 जानेवारीला मेंदू चेक करायचा आणि जिकती बुद्धी कमी तितके पेमेंट कमी.”                                                                                                                                                                                                                                  कामगार संघटनांनी आणि नोकरदार वर्गाने हे विधान कठोर शब्दांत टीकले.निष्कर्ष इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या भव्य साखरपुड्याने निर्माण झालेल्या वादासोबत त्यांची पूर्वीची आक्षेपार्ह आणि महिलाविरोधी विधानांची मालिका पुन्हा चर्चेत आली आहे. साधेपणाचा उपदेश आणि वास्तवातील विरोधाभासामुळे समाजातील अनेक घटक आता आणखी उत्तरांची मागणी करत आहेत.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *