श्रीकांत पाटील-मलकापूर तालुक्यातील वडोदा येथील शेतकऱ्यास शॉक लागून भाजल्या गेल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि सागर राजाराम सुलताने वय २८ रा.वडोदा असे शॉक लागून भाजल्या गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दररोज प्रमाणे सागर सुलताने हे काम करण्यासाठी शेतात गेले होते.शेतात वखर करत असताना त्यांना शॉक लागला. शेजारच्या शेतात शेतकरी काम करत असतांना त्यांना सागर याला शॉक लागल्याचे दिसून आले.त्यांनी त्वरित त्यांना खासगी वाहनाने उपचारासाठी मलकापूर येथील रुग्णालयात आणले.वीज तारामधील पोल याचे अंतर २०० फुट असे असते.मात्र या पोल मधील अंतर ४०० फूट असल्यामुळे तारा खाली लोंबकलेल्या आहेत. त्यामुळे ही घटना घडली असल्याचे त्यांनी मलकापूर लाइव्हशी बोलतांना सांगितले. जो कोणी संबंधित अधिकारी ज्याच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली.जे कोणी दोषी ठरतील त्यांवर कारवाई करू असे आश्रासन आमदार राजेंश एकडे यांनी दिले
Users Today : 1