साहित्यिका स्व.सुंदराबाई आंधळे साहित्यरत्न पुरस्काराने सौ.कविताताई खेडकर सन्मानित

Khozmaster
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पाटोदा  महिला संघटन,ओबीसी चळवळ व सामाजिक क्षेत्रात नेहमी आघाडीवर असलेल्या पाटोदा तालुक्यातील अनपटवाडी येथील व सध्या मुंबई येथे वास्तव करीत असलेल्या सौ.कविताई खेडकर ह्या कुठल्याही अपेक्षा न ठेवता महिलाचे प्रश्न व वंजारी समाजाच्या भल्यासाठी नेहमीच लढत असल्यामुळे सौ.कविताई खेडकर यांचे समाजकार्य पाहून आजतागायत सर्व सामान्यांची निस्वार्थ सेवेत कार्यरत असल्या बद्दल कार्याचा गौरव म्हणून वंजारी महासंघ महाराष्ट्रराज्य साहित्य आघाडी संमेलन नाशिक येते वंजारी महासंघ महाराष्ट्रराज्य साहित्य आघाडी यांनी नाशिक मधील संमेलना मध्ये साहित्यिका स्वर्गीय सुंदराबाई मुरलीधर आंधळे यांच्या स्मरणार्थ वंजारी महासंघ महाराष्ट्रराज्य यांच्या वतीने साहित्यरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला यावर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला सौ. कविताताई खेडकर यांना यावर्षीचा वंजारी महासंघाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा स्वर्गीय सुंदराबाई मुरलीधर आंधळे साहित्यरत्न महाराष्ट्र भूषण वंजारी महासंघाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार सौ.कविताताई खेडकर यांना प्रशांत आंधळे,बाबाराव मुसळे,वंजारी समाज इतिहासाचे गाडे अभ्यासक तथा लेखक गणेश खाडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हास्ते भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात सौ.कविताताई खेडकर यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे  सन्मानित करण्यात आला यावेळी वंजारी महासंघाचे राज्यभरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरस्कार दिल्याने सौ.कविताताई खेडकर यांनी वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य संमेलन आघाडीचे आभार मानले.
0 9 4 7 4 9
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *