औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मठाधिपती रामगिरी महाराज यांचें मार्गदर्शन की शरीर रुपी धनाला ,निरोगी ,निर्व्यसनी, ठेऊन निरामय जीवन जगणे ही जगातील सर्व व्यक्तीची सर्वश्रेष्ठ संपत्ती होय ,असे अमृत वचन सरला बेट(गोदाधाम)चे महंत मठाधिपती हं,भ,प,रामगिरी महाराज यांनी गुरुवार(ता,२९)रोजी सुमनांजली रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात केले,ते पुढे म्हणाले की,सध्याच्या काळात आरोग्यदायी जीवन राखणे हे वाढत्या प्रदूषण मुळे मोठी कसरत जरी असली तरी ,लोकांनी निसर्ग धर्म पाळून आरोग्यला संपत्ती समजून काळजी घ्यावी,सुमनांजली रुग्णालयातील नेत्र विभाग,कान,नाक,घसा विभाग,आयुर्वेद विभाग, दंत रोग विभाग,त्वचा रोग विभाग, होमिओपॅथी विभाग याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं ,या प्रसंगी माजी आ,भाऊसाहेब पा, चिकट गाबकर ,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती विद्यमान उपनगराध्यक्ष साबेर खान, विशाल संचेती,स्वप्नील जेजुरकर,ऍड प्रमोद जगताप, नगरसेवक दशरथ बनकर,डॉ,राजीव डोंगरे,डॉ,सुभाष भोपळे यांची प्रमुख उपस्थिती होती,सुमनांजली चे डॉ,संतोष संघवी,डॉ,पूजा संतोष संघवी,जिनदास संघवी,शोभा संघवी,रवींद्र संघवी, अजित संघवी ,संजय आंबेकर यांनी महाराजांचे पूजन व उपस्थितीतांचे स्वागत केले,सूत्रसंचलन करून आभार सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी मानले,या प्रसंगी पंकज ठोंबरे,अखिल शेख,पारस घाटे, लिमेश वाणी ब राजेश गायकवाड,काशिनाथ गायकवाड, प्रकाश बोथरा, बाबासाहेब जगताप, संजय
बोरनारे, ज्ञानेश्वर टेके,श्री लहाने,यांची उपस्थिती होती,
शेवटी डॉ,संतोष संघवी यांनी सर्वांचे आभार मानले(फोटो कॅप्शन -हं,भ,प,रामगिरी महाराज उपस्थिताना संबोधित करतांना, संत पिठावर सर्व मान्यवर)
Users Today : 37