पाण्यात बुडून वृद्धेचा मृत्यू.

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार –: पाण्यातून जीव धोक्यात घालून वाट काढणाऱ्या वृद्धेचा रस्त्यावर साचलेल्या पाण्यात तोल गेल्याने धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे .   नवापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे नागण मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे . धरणाच्या वरती असलेल्या केळी , केवडीपाडा गावा दरम्यान जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे . नागरिकांना या ठिकाणी पाण्यातून जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत आहे .    आज केळी येथील रहिवासी रतुबाई जयराम गावित ( वय ६० ),या केळीहून केवडीपाडा गावात येत असताना रस्त्यावर साचलेल्या पाण्यात तोल गेल्याने धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे .

 

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *