दिपक मापारी, रिसोड .तालुक्यातील पावसामुळे व मोझॅक झालेल्या नुकसानीची सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई घ्या तालुक्यातील मागील काही दिवसांपासून सलग मुसळधार पाऊस झाल्याने व मोझॅकने मुळे सोयाबीन पूर्णपणे सोयाबीनचे नुकसान झालेने शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे. शेतात पाणी साचून शेताला नदी नाल्यांचे स्वरूप आल्याने आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी साचलं आहे. मात्र शेतकरी आपल्या रोजीरोटीसाठी संपूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच अतोनात नुकसान झालं तर काही ठिकाणी शेत जमीन खरडून गेली शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून आतापर्यंत शेतकऱ्याना अजुन कोणतीही मदत मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होत आहे. रिसोड तालुक्यातील पाहायला गेलं तर 70 टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व मोझॅक मुळे बऱ्याच शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झाले. मात्र शेतीच्या समस्यांचे मूळ शोधण्यात आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांच्या लवकर मदत करण्यात यावी अशी मागणी मा तहसीलदार साहेब रिसोड व तालुका कृषि अधिकारी रिसोड यांना निवेदन देण्यात आले आहे भूमिपुत्रचे युवक जिल्हा उपाध्यक्ष व भुमिपुत्र ट्रेडिंग कंपनी मालक रवि पाटील जाधव, रुपेश पाटील बाजड,संतोष गव्हाणे, दिनकर गव्हाणे ,विठ्ठल गव्हाणे, रामचंद्र गव्हाणे ,शामराव कांबळे ,सोपान गव्हाणे, भारत गव्हाणे यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.
Users Today : 27