नखेगाव येथील पुरामुळे नदीकाठ खचल्याने जमिनीला पडल्या भेगा.. नदीकाठच्या ६७ कुटुंबाच्या जिवाला मात्र धोका.

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी विशाल गवई अकोट तालुक्यातील शहानूर नदीकाठी बसलेल्या ग्राम नखेगाव येथील ग्रामस्थांवर पुराच्या पाण्याने मोठा गंभीर प्रसंग ओढवला असून नदीकाठ खचल्याने जमेनीला प्रचंड मोठ्या भेगा पडल्या आहेत. ह्या भेगांनी ६७ घरांना धोका निर्माण झाला असून त्यावर त्वरित उपाययोजना न केल्यास या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ येणार आहे.पावसाळ्याच्या सरत्या काळात पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. पाऊसामुळे आकोट तालुक्याला मोठा फटका बसला आहे.तालुक्यातील हे गाव नदी काठी बसलेले आहे.हा भाग शेजारील सातपुडा पर्वताच्या पायाचा डोंगर उतार असल्याने ही नदी प्रचंड वेगाने वाहते. अतिवृष्टीने या नदीने रौद्ररूप धारण केले. सततच्या वाहत्या पुराने नदीकाठ खचने सुरू झाले आहे. त्यामुळे प्रचंड वेगाने भूस्खलन होत आहे.परिणामी गावापासून थोड्याशा अंतरावर असलेले नदीपात्र रूंद होत चालले आहे. रूंदहोत असलेले पात्र आता गावातील घरापर्यंत येऊ लागले आहे. या ठिकाणी सन १९७९ पासूनबांधून दिलेली इंदिरा आवास योजनेची घरे आहेत. आता त्या

परांच्या सभोवती पंतप्रधान आवास योजना आणि रमाईघ रकुल योजना या अंतर्गत अनेक घरे बांधलेली आहेत. त्यामुळे 

या ठिकाणी गरीब मजूर वर्गाचे अधिक्य आहे. नदीच्या पुराचा धोका लक्षात घेऊन स्थानीय ग्रामपंचायतने या लोकांना इतर ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु दैनंदिन मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या या ग्रामस्थांवर इतर ठिकाणी घरी बांधणे आशक्य आहे. त्यामुळे या लोकांनी नेमके कुठे जावे? आणि काय करावे? हे सूचनासे झाले आहे. दिनांक २० तारखेला या ग्रामस्थांनी अकोट उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन या कडे लक्ष देण्याची मागणी केली आहे या ठिकाणी जर असेच भुस्कलन नेहमी होत राहीले तर येत्या काही वर्षात ही ६७ ही घरे जमीनदोस्त होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे मानतेच्या दृष्टिकोनातून लोकांना शासन स्तरावरून मदत होणे ही काळाची गरज आहे.

 

0 8 9 4 8 1
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *