प्रतिनिधी:-शिवाजी उदार मेरा खुर्द : गेल्या काही महिन्यांपूर्वी असोला येथील एका व्यापाऱ्याने शेकडो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना करोडो रुपायांनी गंडवले. आता हरभरा मालाचा जास्तीचा मोबदला देतो म्हणून १६ शेतकऱ्यांची भामट्या व्यापाऱ्याने ३० लाखांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. डिग्रसचे
शेतकरी प्रभाकर हूसे यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी आरोपी प्रताप श्रीराम बोरुडे
(वीरसांवगी, ता. मेहकर) याच्याविरुद्ध २३सप्टेंबरला गुन्हा दाखल केला.काही महिन्यांपूर्वी असोला येथील वहिद
खान दिलावर खान या व्यापाऱ्याने अंत्री खेडेकर, मेरा खुर्द, असोला, देऊळगाव घुबे येथील शेकडो शेतकऱ्यांकडून वाढीव रकमेचे आमिष दाखवून चार कोटी रुपयांचे सोयाबीन खरेदी केले. नंतर तो फरार झाला
आजपर्यंत तो सापडला नाही.आता डिग्रस बुद्रुकचे शेतकरी प्रभाकर संपत हुसे यांनी
अंढेरा पोलिसांत फसवणुकीची तक्रार केली आहे. २२ जुलै २०२१ रोजी ३० क्विं
५५ किलो हरभरा ५१०० रुपये क्विंटल या प्रमाणे मेहकर तालुक्यातील वीरसावंगी येथील प्रभाकर बोरुडे याला विकला. त्याची किंमत १ लाख
४५ हजार २०० रुपये आहे. आडत्याने जुलै २०२१ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाचा चेक देऊन तो दोन महिन्यांनंतर जमा करेन
सांगितले.ठरल्यानुसार ४ऑक्टोबर २०रोजी चिखली अर्बन बँक शाखा देऊळगाव मही येथे जमा केला होता. परंतु व्यापाऱ्याच्या खात्यात पैसे नसल्याने चेक बाऊन्स झाला.
याबाबत विचारणा केली असता व्यापाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.प्रभाकर हुसे यांच्याप्रमाणेच आणखी १६ शेतकऱ्यांनाही ५८० क्विंटल ५८ किलो
(किंमत २९ लाख ४६ हजार७९६ रुपये)हरभरा विकत घेऊन त्यांची फसवणूक केली.ठाणेदार हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली
आरोपी प्रताप श्रीराम बोरूडे याच्याविरुद्ध भादंवि कलम ४०६, ४०९, ४२०, नुसाम
फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे
कैलास उगले, गजानन वाघ, मोरसिंग राठोड,सुरेश गवई, विलास काकड, समाधान झिने
करीत आहेत.