गावबंदी कराल, हक्कांवर गदा आणाल तर आम्ही गप्प बसणार नाही, क्रांतीभूमीतून भुजबळांचा इशारा

Khozmaster
3 Min Read

पुणे : आपल्या हक्कासाठी लढण्याचा अधिकार प्रत्येक समाजाला आहे. परंतु, गावबंदीसारखे मार्ग अवलंबून कोणी हक्कांवर गदा आणू पहात असेल, तर त्याविरोधात आम्ही आवाज उठविल्याशिवाय राहणार नाही.आमच्या हक्कांवर गदा, गंडांतर आणले जाणार असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांनी मंगळवारी दिला. त्याचबरोबर राज्यात अलीकडे नवीनच वर्णव्यवस्था अस्तित्वात येऊ पहात आहे, अशी टिपण्णीही त्यांनी केली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे भुजबळ यांच्या हस्ते महात्मा फुले यांचा १३३ व्या स्मृतीदिन आणि समता दिनानिमित्त यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना प्रदान करण्यात आला. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार रवींद्र धंगेकर, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, परिषदेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष प्रीतेश गवळी, प्रदेश महिला अध्यक्षा मंजिरी धाडगे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, पुणे महानगर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, शब्बीर अन्सारी, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, दिलीप कांबळे, वैशाली बनकर आदी उपस्थित होते. नागेश गवळी यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. प्रा.गौतम बेंगाळे यांनी मानपत्राचे वाचन केले. पंढरीनाथ बनकर यांनी आभार मानले.                                                                                                           निधी न दिल्यास आंदोलन

महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या भिडे वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून टप्प्याने आंदोलन करून हे यश मिळाले आहे. भिडे वाड्याच्या धर्तीवर महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग लवकरच मोकळा व्हावा. या स्मारकासाठी आगामी काळात निधी उपलब्ध न झाल्यास आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा छगन भुजबळ यांनी मंगळवारी दिला.                                                                                               हक्कावर गदा येत असेल तर थांबायचे नाही

सध्याच्या परिस्थितीत वर्णव्यवस्था पुन्हा डोकं वर काढत आहे. मात्र आपल्याला फुले, शाहू, आंबेडकरांनी समतेचा विचार दिला आहे. त्यामुळे अन्याय झाला झाला तर त्यावर आवाज उठवावाच लागेल. यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करण्याची आवश्यकता असून आपल्या हक्कावर गदा येत असेल तर थांबायचे नाही असे आवाहन त्यांनी केलं.

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *