सिंदखेडराजा : (एशिया मंच न्युज) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कालपासून मातृतीर्थ सिंदखेडराजात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकर अन्नत्याग करीत आहेत. हे आता आंदोलन व्यापक होण्याची चिन्हे दिसत आहेत. रविकांत तुपकर यांची हटके आंदोलनाची स्टाईल पाहता तुपकर आता पुढे नेमका काय पवित्रा घेणार याकडे शेतकऱ्यांसह प्रशासनाचे, पोलीस यंत्रणांचे देखील लक्ष लागून आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून काल सायंकाळी उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, तहसीलदार, पिकविमा कंपनीचे अधिकारी, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी रविकांत तुपकर यांना भेटायला आंदोलनस्थळी आले. आपण आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती अधिकाऱ्यांनी तुपकरांना केली. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होवून अंमलबजावणी सुरू होत नाही तोपर्यंत अन्नाचा कण देखील घेणार नाही, असे तुपकर यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले. यावेळी तुपकर यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने अधिकारीही निरुत्तर झाले. पिकविम्याच्या प्रश्नांवर तुपकरांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. सरकारने पिकविमा कंपनीला रक्कम दिली आहे. मात्र तरीही पिकविमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत नाही. त्यामुळे तुम्ही पिकविमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत नाही. त्यामुळे तुम्ही पिकविमा कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा का दाखल करीत नाही..? असा सवाल तुपकरांनी केला. या प्रश्नांचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नव्हते.

Khozmaster
1 Min Read
बुलडाणा 
          मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे , चूनपिंपरी , बेरदड शिवारातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी 2023-24 मध्ये आपल्या पिकाचा विमा काढला होता. त्यामधून काही लोकांना पिक विमा मिळाला असून काही लोकांना विमा मिळाला नाही त्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी बुलडाणा यांना 20 ते 25 शेतकऱ्यांनी लेखी तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद आहे की आम्ही मागील वर्षी पिक विमा काढला होता परंतु आम्ही तक्रार किंवा क्लेम केला नसल्यामुळे आमचे नाव यादीत आले नाही त्याकरिता आम्हाला पिक विमा देण्यात यावे, अशी मागणी धामणगाव बढे परिसरातील शेतकरी यांनी केली आहे. या निवेदनावर चरण सिंग गोबरा राठोड , कनीराम रोडू राठोड, मदनसिंग गणपत राठोड, उदयसिंग मोहन राठोड , बिरबल सूर्यभान राठोड, हिरासिंग आसाराम राठोड , गजानन रंगलाल राठोड, जगराम रतन पवार, हरसिंग मानसिंग चव्हाण, दुबा उगराज राठोड, शिवा मारू जाधव, कौतिक शेषमल राठोड, शिवा जयसिंग राठोड, हरिदास बुका राठोड, सुरेश थावरू राठोड, रमेश रतन राठोड, हंजारी रायसिंग चव्हाण, संजय बाबू सिंग राठोड, यांच्या सह शेतकरी बांधव उपस्थित होते.
0 9 4 9 6 2
Users Today : 134
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *