गिरडाघाटात अखेर सहा बिबटे बुलढाणा वनपरिक्षेत्र कडून जेरबंद;मात्र अजिंठा वनविभाग साखर झोपेत

Khozmaster
3 Min Read
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथून सहा किमी अंतरावर असलेल्या गिरडाटात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली होती मागील काही दिवसांत बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केले होते.बुलढाणा,अजिंठा पर्वतरांगा आहेत. या अजिंठा पर्वतावर गिरडा हे गाव वसले आहे. गावाला वेढा घातलेल्या दाट आणि विस्तीर्ण जंगलात बिबट, अस्वल, सारख्या वन्य प्राण्यांचे गावकऱ्यांना नेहमीच दर्शन होते. यामुळे रात्री उशिरा शेताकडे वा दूर जाण्याचे गावकरी कटाक्षाने टाळतात.असेच बिबट्याचे व तरसचे दर्शन सध्या सावळदबारा परिसरात होत आहे.अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना वेळोवेळी सांगून अद्याप पर्यंत पिंजरा लावण्यात अपयशी ठरत आहे.सावळदबारा परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली शेतकऱ्यांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र अजिंठा वन विभाग सुस्त झाला आहे.गिरडा वन वर्तुळात घनदाट जंगल, गर्द झुडुपे, नाले आदी पाण्याचे जलस्रोत, दऱ्याखोऱ्यात लपण्यासाठी कपारी, उपलब्ध असलेल्या ‘शिकार’, मानवी वस्त्यामुळे उपलब्ध असलेली पाळीव जनावरे, अनुकूल भौगोलिक परिस्थिती आदी विविध कारणांमुळे गिरडा ‘सर्कल’मध्ये बिबट्यांची संख्या आणि वावर वाढला आहे. बुलढाणा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गिरडा वन वर्तुळात बिबट्यांचा वावर वाढला आहे. अलीकडच्या एका घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात युवा शेतकरी मृत्युमुखी पडल्याने वन विभाग सतर्क झाला आहे. यामुळे विविध उपाययोजना करण्यात येत असून पाच बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. आज गुरुवारी एका मादी बिबटला पकडण्यात आले असून तिची नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयमध्ये रवानगी करण्यात आली आहे.मानवी वस्त्या विस्तारल्या की संघर्ष वाढतो. यातूनच वन्यजीव आणि मानवी संघर्षांच्या घटना गिरडा परिसरात अधूनमधून घडतात. शेतकऱ्यांच्या पशू धनावर हल्ल्याच्या तुरळक घटना घडल्या. मात्र, मर्यादेत असलेल्या वन्यजीव आणि मानवी संघर्ष गत ऑगस्ट महिन्यात भीषण झाला.मागील २९ ऑगस्ट २०२४ रोजी भरदिवसा दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सुभाष जाधव हा युवा शेतकरी ठार झाला होता. तो आपल्या जंगलाला लागून असलेल्या शेतात कामासाठी आला होता. त्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याने जंगलापर्यंत फरफटत नेले होते. त्याचा अकाली मृत्यू झाला. गिरडा परिसरासह पंचक्रोशीतील हजारो नागरिक व शेतकरी या घटनेमुळे भयभीत झाले होते. या गंभीर घटनेमुळे अधिक सतर्क झालेल्या वन विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. गिरडा गावाजवळ २ पिंजरे लावून वन कर्मचाऱ्यांची ३ पथके स्थापन करण्यात आली. गावकऱ्यांमध्ये जागृती करत वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढवली होती. वनविभागाने लावलेल्या या पिंजऱ्यात आज गुरुवारी, १२ सप्टेंबर रोजी एक मादी बिबट अडकली ! या बिबटला नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाकडे रवाना करण्यात आल्याची माहिती बुलढाणा ‘एसीएफ’ अश्विनी आपेट यांनी उपसंपादक गोकुळसिंग राजपूत यांच्याशी बोलताना दिली आहे. आज अखेर बुलढाणा वन विभागाने गिरडा परिसरातून एकूण पाच बिबट्यांना जेरबंद केले आहे. यापैकी ३ बिबट मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबारवा अभयारण्यात सोडण्यात आले. उर्वरित दोघा बिबट्यांना नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात सोडले. यामुळे गिरडावासी भयमुक्त झाले आहे.
0 9 4 5 7 6
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *