हिंगोली : हिंगोली तालुक्यातील भटसावंगी तांडा येथील व्यक्तीचा दुबईमध्ये अपघात अपघातात हॉस्पिटलमध्ये कोमा मध्ये असल्याची सध्या मिळते माहिती मिळाली आहे. दिलीप मंगू जाधव (वय ४१) हे २५ वर्षांपूर्वी गोव्याला कामानिमित्त गेले होते. त्यानंतर ते गोव्यावरून दुबईला गेले. गावाकडील घरची परिस्थिती अगदी नाजूक असल्याने गावाकडे आई आणि वहिनी दोघेच घरी राहतात. गावाकडे हे दोघेजण आपल्या जीवनाचा गाडा व उदरनिर्वाह चालवतात. दिलीप हे दुबईवरून कधी आई आणि वहिणीसाठी आर्थिक मदत पाठवत होते. दिलीप यांचे वडील मंगू जाधव आणि भाऊ गजानन जाधव यांचा मृत्यू झाल्याने गावाकडे आई कुबूलूबाई मंगू जाधव आणि वहिनी दोघी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात.लहान वयातच दिलीप गोव्याला कामानिमित्ताने गेले आणि त्यानंतर त्यांनी कधी दुबई गाठली हे गावाकडील नागरिकांना देखील माहिती पडलं नाही. आई आणि वहिनीशी ते फोनवरून चौकशी करायचे. त्यांना पैसे देखील पाठवायचे आणि अचानक एक दिवस दुबईवरून आईला फोन आला आणि दिलीप यांचा मृत्यू झाल्याची दुःखद वार्ता आईला सांगण्यात आली. दुःखद वार्ता ऐकून आईने हंबरडा फोडला.यावर चौकशी करून दूतावासाकडे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं पत्र आणि इतर पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, काही दिवसांनी दुबईत असलेल्या भारतीय दूधवासाकडून दिलीप यांचा अपघात झाला असून ते सध्या दुबईतील हॉस्पिटलमध्ये कोमात असल्याचं सांगण्यात आलं आहे. एका अपघातात त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली आणि त्यांचा डोक्याचा काही भाग निकामी झाला असल्याचं सांगितलं जातं आहे. दिलीप जाधव हे दुबईतील एका आक्युरो स्पेशालिस्ट सपोर्ट सर्विसेस या ठिकाणी कामाला होते.दिलीप यांची गावाकडे दि.११ सप्टेंबर रोजी निधनाची वार्ता कळाली होती. मात्र नंतर चार दिवसांनी दिलीप यांची अपघाताची वार्ता आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचं आईला कळवले. आईने देखील आता मुलाच्या आयुष्यासाठी जणू देवाकडे प्रार्थना केली होती अन् देवाने आईचं ऐकलं आहे. आईचे डोळे सध्या दिलीप राहत असलेल्या दुबईच्या दिशेने लागले आहेत.
Users Today : 12