मुंबई : सोमवारी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही विशिष्ट समुदायाचे नाव न घेता ‘व्होट जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ या विषयांवर भाष्य केले. कोल्हापुरातील कणेरी मठातील संतसमावेश कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी या विषयांवर जोर दिला आणि त्याचा राजकीय पटलावर होणारा परिणाम बोलून दाखवला आहे. कोल्हापूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) जवळचे संबंध असलेले लिंगायत द्रष्ट्य काडसिद्धेश्वर महाराज यांनी या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंगळवारी समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी १४ जागांवर “व्होट जिहाद” दिसून आल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांनी दावा केला की, एका विशिष्ट समुदायातील व्यक्तींनी हिंदुत्ववादी उमेदवारांना पराभूत करण्यासाठी एकत्रितपणे मतदान केले. इतर समाजाची लोकसंख्या झपाट्याने वाढण्यावर भर देत फडणवीसांनी १४ मतदारसंघात “मत जिहाद” पॅटर्न दिसल्याचे नमूद केले. मात्र, त्यांनी लोकसभेच्या त्या १४ जागा किंवा त्यांच्या निकालांबाबत अतिरिक्त माहिती दिली नाही.धुळ्यात पाच विधानसभा मतदारसंघात एक उमेदवार १ लाख ९० हजार मतांनी आघाडीवर होता. मात्र, एका मतदारसंघात (मालेगाव) दुसऱ्या उमेदवाराला १ लाख ९४ हजार मते मिळाली, त्यामुळे दुसरा उमेदवार ४००० मतांनी विजयी झाला. इतर समाजातील लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे. आता ते कमी संख्येनेही हिंदुत्ववाद्यांचा पराभव करू शकतात, असा विश्वास त्यांना वाटू लागला आहे, असे फडणवीस म्हणाले. गेल्या दशकातील संबंधित विवाह प्रकरणाच्या वाढत्या संख्येचा उल्लेख करत फडणवीसांनी”लव्ह जिहाद” बद्दल चर्चा केली. “आता लव्ह जिहादच्या 1 लाखांहून अधिक तक्रारी आहेत, ज्यामध्ये हिंदू मुलींना काही विशिष्ट समाजाची लोक फसवतात. मुलींची लग्ने करून, २-३ मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांना सोडून दिले जाते. लव्ह जिहाद आपल्या समाजातील मुलींना कलंकित करत आहे असे फडणवीस म्हणाले.
Users Today : 18