श्वानांच्या उद्रेकाने नागरिक त्रस्त

Khozmaster
1 Min Read

पातूर:-विशेष प्रतिनिधी 

गेल्या कित्येक दिवसांपासून पातूर शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला असून, यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. यासमस्येकडे नगर प्रशासनाची भूमिका कथित बघ्याची असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या वाढत्या उपद्रवाचा गंभीर परिणाम आता समोर येत आहे.
मागील केवळ चार दिवसांत पातूर शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हैदोस घातला आहे. या कुत्र्याने तब्बल आठ लोकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या आठ जणांपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे होणारे अपघात आणि चावा घेणे या घटना नित्याच्या झाल्या आहेत. मात्र, आता पिसाळलेल्या कुत्र्याने लोकांना लक्ष्य केल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. नागरिक एकटे बाहेर पडायला घाबरत आहेत, विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर घटनेनंतरही प्रशासनाकडून तातडीने ठोस पावले उचलली जात नसल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *