खोट्या तक्रारीवर महिला शेतकऱ्यावर ३२ लाखांचा दंड; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक दंड रद्द करून अतिक्रमण हटविण्यासाठी तहसीलदारांना सात दिवसांचा अल्टिमेटम

KHOZ MASTER
3 Min Read

अकोला,

शासकीय साखळी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांच्या कथित खोट्या तक्रारीवरून एका महिला शेतकरी कुटुंबावर तब्बल ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याच्या प्रकरणावरून वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक झाली आहे. प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कुणाल झाल्टे यांची भेट घेत या निर्णयाविरोधात तीव्र आक्षेप नोंदवला. तसेच दंड तातडीने रद्द करून शासकीय रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

शेतकरी लता लांडे, मारोती ढोरे आणि सुरेश निंबेकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या तक्रारीनुसार, काही शेतकऱ्यांनी झाडे तोडून तसेच विहिरीवरील मुरूम शेतात टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीनंतर मंडळ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात सरकारी साखळी रस्ता अडवून ठेवणारे तक्रारदारच असल्याचा दावा शेतकरी व युवा आघाडीने केला आहे.

या प्रकरणात दि. १० एप्रिल २०२६ रोजी महिला शेतकरीपुत्र रवि दुतोंडे यांच्यावर तहसीलदारांनी ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, दुतोंडे यांची शेती बेलोरा येथे असून संबंधित रस्त्याशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. माझोड येथील गट क्रमांक ३५७, ३५८ आणि ३६० जवळील शासकीय रस्ता तक्रारकर्त्यांनीच अडविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी तहसीलदारांच्या आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा निर्णय राजकीय दबावातून झाल्याचा आरोप केला. घरकुल, विहिरीवरील माती, दगड व मुरूम शेतात किंवा अन्य ठिकाणी नेण्यासाठी रॉयल्टी लागत नसल्याचा शासन निर्णयही त्यांनी तहसीलदारांकडे सादर केला. तसेच मंडळ अधिकाऱ्यांचा स्थळ पाहणी अहवाल बनावट असल्याचाही आरोप करण्यात आला.

वंचित बहुजन युवा आघाडीने ३२ लाखांचा दंड त्वरित रद्द करावा, शासकीय रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत आणि भूमी अभिलेख विभागामार्फत पोलिस बंदोबस्तात मोजणी करून पावसाळ्यापूर्वी रस्ता मोकळा करावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी हे प्रकरण पुन्हा तपासून आठ दिवसांत निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, नागेश उमाळे, आकाश जंजाळ, सुगत डोंगरे, अमोल वानखडे, साहिल बोदडे, निशिकांत सदार, हर्षल लोखंडे यांच्यासह जयंत खंडारे, रवींद्र दुतोंडे, गणेश घोगरे, गजानन फोटोकार, बाजीराव खंडारे, अशोक गायकवाड, मनोर काटे, भिकाजी खंडारे, चंदन इंगळे, मुंगुटराव खंडारे, सिद्धार्थ वानखडे, देवेंद्र इंगळे, ज्ञानदेव खंडारे, रामभाऊ गवई, सुरेश खंडारे, आदित्य खंडारे, नाजूकराव खंडारे, प्रवीण खंडारे, महादेव पवार, रवी ढवळे, खुशाल खंडारे, संकेत खंडारे आणि अरुण खंडारे उपस्थित होते.

 

0 9 7 4 1 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *