नागपूरमध्ये १४ वर्षीय अथर्व ननोरेची निःष्पाप हत्या; पोलिसांच्या तपासाला अद्याप यश नाही*

KHOZ MASTER
2 Min Read

नागपूर

नागपूरमध्ये १४ वर्षीय अथर्व ननोरेच्या निःष्पाप, क्रूर आणि पूर्वनियोजित हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. मारेकऱ्याने अत्यंत थंड डोक्याने व विचारपूर्वक केलेल्या या कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

अथर्व २ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शोभायात्रेसाठी घरातून बाहेर पडला आणि थोड्या वेळानंतर आइस्क्रीम खाण्यासाठी मार्गावर गेला. या दरम्यान त्याचे अपहरण झाले आणि मारेकऱ्यांनी त्याला बेदम मारहाण करून, हातपाय बांधून, शस्त्राने वार करत गळा दाबून ठार केले. मृतदेह पोत्यात भरून भरतवाडा बायपासजवळ फेकल्याचे पोलिसांनी अंदाज लावला आहे. पोत्यामध्ये आलूकांद्याचे पोते होते आणि त्यावरच्या लेबलच्या माध्यमातून काही सुराग मिळेल का, याची तपासणी सुरू आहे.

अत्यंत कठीण बाब म्हणजे, मारेकऱ्यांनी अपहरणानंतर कोणतीही मागणी केली नाही, त्यामुळे ही हत्या *पूर्वनियोजित व हेतुपुरस्सर* असल्याचे स्पष्ट होते. पोलिसांचे प्राथमिक अंदाज आहे की मारेकऱ्याला अथर्वाच्या हालचालींची माहिती अगोदरपासून होती. तसेच, अपहरण केलेल्या ठिकाणावर सीसीटीव्ही किंवा इतर माहिती नसल्यानं मारेकऱ्याचा मागोवा घेणे कठीण ठरत आहे.

पोलिस तपास गुन्हे शाखेसह गिट्टीखदान पोलिसांच्या समन्वयाखाली सुरू आहे. आर्थिक व वैयक्तिक वैरभाव किंवा इतर कारणांमुळे ही हत्या झाली असावी, याची शक्यता तपासली जात आहे. सध्या सर्व शक्यता, संशयित व्यक्ती आणि घटना क्रम यांची यादी तयार करून आरोपींचा शोध सुरू आहे.

अथर्वच्या हत्येच्या या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिस तपास यंत्रणा गंभीर परिस्थिती सामोरे जात असून, आरोपी पकडण्याचा तातडीने प्रयत्न सुरू आहे.

0 9 5 7 3 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *