रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोबाईल नेटवर्क समस्यांवर नव्याने सर्वेक्षणाचे निर्देश; कृती आराखडा सादर करण्याचे आदेश*

KHOZ MASTER
1 Min Read

रत्नागिरी/सिंधुदुर्ग
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये मोबाईल नेटवर्क आणि 4G सुविधांच्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी तालुकानिहाय नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे, तसेच त्यावर आधारित सविस्तर कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

या संदर्भात आयोजित बैठकीत जिल्हा प्रशासन, भारत संचार निगम (BSNL) तसेच संबंधित तांत्रिक यंत्रणांचा संयुक्त सहभाग होता. दुर्गम भागांतील नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

बैठकीस आमदार शेखर निकम, महाआयटीच्या संचालक भुवनेश्वरी एस., महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर, विभागाचे अवर सचिव योगेश गोसावी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे संबंधित निवासी जिल्हाधिकारी आणि भारत संचार निगमचे अधिकारी अमित पाटील उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भौगोलिक अडचणींमुळे मोबाईल टॉवर उभारणी व नेटवर्क सिग्नल पोहोचण्यात येणाऱ्या अडथळ्यांची माहिती सादर केली. तसेच विद्यमान 4G सेवेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, दुर्गम भागातील नागरिकांना डिजिटल सेवांपासून वंचित राहू नये यासाठी प्रभावी नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्याचा सविस्तर सर्वे करून प्रत्यक्ष परिस्थितीनुसार कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

या निर्णयामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क समस्यांवर ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *