पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रिठीपाडा या गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून डबक्यातला गाळ काढला*

Khozmaster
1 Min Read
पालगर प्रतिनिधी, सौरभ कामडी
     जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम वावर वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सागपाणी व रिठीपाडा या पाड्यामध्ये दरवर्षी प्रमाणे पाणी टंचाई येत आहे.तर दिंनाक १७ नोव्हेंबर रोजी रिठीपाडा येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून कोबा विहरितील गाळ काढला.या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये येथील विहरीतील पाण्याचा पुरवठा कमी होताना दिसून आला आहे.
       रीठीपाडा येथे पाणी टंचाई निर्माण झाली होती परंतु वावर , सागपाणी येथील कार्यकर्त्यांचे सहकार्याने रीठीपाडा गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून कोबा विहारीतील गाळ काढल्याने तात्पुरती स्वरुपात पाणी टंचाई वर मात केली आहे.या प्रसंगी वावर वांगणी ग्रामपंचायत चे शिपाई सोमनाथ बुधर , तंगास रावते, पावलुस बुधर,तसेच रिठीपाडा गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *