पेठ/चिखली प्रतिनीधी रवि मगर
संविधान दीन साजरा करण्या करीता पेठ गावातील बहूजन एकत्र येऊन या कार्यक्रमाचे नियोजन केले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पेठ गांव चे सरपंच विष्णूपंत शेळके यांनी स्वीकारले तसेच ,व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पित करुन कार्यक्रमाची सुरुवात केली, विषेष मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव मिसाळ व मनोज जाधव यांनी केले,या वेळेस रोजी भारतीय राज्य घटना संविधान दीन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, ज्या संविधाना मुळे आज आपण समाजात , वावरतो तो दीवस भारतातील सर्व समाजाने साजरा केला पाहीजे, पण असे होतांना दीसत नाही,जिथे तीथे बौद्ध समाजच का संविधान दीन साजरी करतात, ज्या दीवशी संविधान दीन बौद्धसमाज व्यतीरीक्त ईतर समाज संविधान दीन साजरी करेल, त्या दीवशी खरा संविधान दीन व या संविधाना चे शिल्पकार परम पूज्य डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली मानल्या जाईल , असे मार्गदर्शन करतांना सामाजीक कार्यकर्ते मनोजभाऊ जाधव यांनी सांगीतले, तसेच , या कार्यक्रमा मधे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव मिसाळ यांनी सांगीतले की फक्त शासनाचे आदेश आलेत म्हणून आपण संविधान दीन साजरा करतोय पण आपण भारतीय आहोत तर आपल्याला संविधान दीन साजरा करायला तर शासनाच्या आदेशाची वाट का पहावी, या कार्यक्रमाला शेतकरी संघटने चे संतोष शेळके, मधुकर वाकोडे,दीलीप गवई , अशोकरत्न मिडीया चे जिल्हा संपादक रवि मगर, गजानन गवई, मंगेश रिंढे, आकाश रिंढे, प्रदीप मिसाळ, पंकज राजगुरु,सिंधुबाई मिसाळ, जिजाबाई गवई,लताबाई रिंढे, व ईत्यादी उपस्थीत होते,
Users Today : 37