प्रतिनिधी प्रविण चव्हाण
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित
राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 ( 1 ) ( 3 ) अन्वये 19 डिसेंबर , 2022 रोजी रात्री 12 वाजे पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे . सदरचे आदेश लग्नकार्य , मिरवणुका , तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत . तसेच हा आदेश पोलीस अधिकारी , कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी , कर्मचारी यांना , सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही . आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल ,
असे आदेशात नमूद करण्यात आले आहे .
Users Today : 26