सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव-रब्बी हंगामात पिकामध्ये निंदण, काडी कचरा वेचने आणि पिकांना पाणी देण्याच्या कामाला वेग आलेला दिसतो.शेतकरी मजुर शेतीचे काम उत्साहाने करत असुन शेतकऱ्यांमध्ये शेती पिकवण्यासाठीची धडपडही दिसत आहे.सध्या मोठ्या संख्येने रब्बी हंगामातील अतिशय महत्त्वाचे हरभरा पिक समजले जाते आणि सध्या या पिकामध्ये निंदन काडी कचरा वेचणे इत्यादी मोठ्या संख्येने काम करत दिसत आहे .महिला आणि पुरुष दुसरे पिकाला पाणी देण्यासाठी धावपळ स्पिंकलरच्या द्वारे करीत आहे.पिकाला पाणी स्पिंकलरने देण्याचीही गरज भासते. पिकाला वाचवण्याकरता कसरत शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे.अतिशय पोषक वातावरण मध्ये प्रचंड प्रमाणात पिकामध्ये वाढ पाहायला मिळत आहे व शेतकरी वर्गात आनंदमय वातावरण पाहायला मिळत आहे. सध्याच्या परिस्थिती चांगले पीक फुलफुलित दिसत आहे.परंतु यापुढेही वातावरण नैसर्गिक बदलांमध्ये परिणाम पाहायला दिसतील याची चिंता शेतकऱ्यांना वाटत आहे.
Users Today : 39