प्रतिनीधी रवि मगर
गरीबी निर्मूलन समिती राष्ट्रीय अध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर गरिबी निर्मूलनच काम चालू असून विदर्भाध्यक्ष राजेंद्रजी लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली गरिबी निर्मूलनची पुढील वर्षासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत देशातील गरीब नागरिकांना मोफत अन्नधान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.संदर्भातील माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्याचे मंत्री पियुष गोयल यांनी twitter दिले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत देशातील गरीब जनतेला जो मोफत अन्नधान्य पुरवठा केला जाणार आहे त्यासाठी दोन लाख कोटी खर्च येणार आहे हा खर्च केंद्र शासन उचलणार आहे.गरीब वर्गांतील 81:35 कोटी लोकांना केंद्र सरकारने एक प्रकारे हे न्यू इयर गिफ्ट दिले आहे राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत एक वर्षासाठी मोफत अन्नधान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत प्रति किलो दोन ते तीन रुपये दराने प्रति व्यक्तीस पाच किलोग्रॅम धान्य दरमहा देण्यात अत्यंत योजनेत समाविष्ट असल्यास कुटुंबांना दरमहा 35 किलो आणि केंद्र सरकारकडून दिले जाते राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत गरीब जनतेला ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ तर २रुपये प्रति किलो दराने गहू देण्यात येतो. महाराष्ट्र सह संपूर्ण देशामध्ये गरीब जनतेला या योजनेचा लाभ मिळणार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत मोफत धान्य मिळणार असल्याने गरीब जनतेस याचा फायदा होणार आहे गरिबांना मोफत धान्य 1 जानेवारी 2023 पासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. गरिबी निर्मूलन समिती विदर्भाध्यक्ष राजेंद्रजी लहाने उषाताई साळवे माया पवार सुनील सालकुटे उर्फ भावसार इवरील माहिती नुसार गहू तांदूळ याचे वाटप होणार आहे.
Users Today : 20