औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री : तालुक्यातील पीरबावडा येथे स्वतःच्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली होती. महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून मयतेच्या पतीविरुद्ध वडोदबाजार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिरबावडा तालुका फुलंब्री येथे २७ डिसेंबर २०२२ रोजी कौशल्याबाई दिलीप गाडेकर या आपल्या गट क्रमांक २४५ पिरबावडा शिवार या शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या. मात्र २७ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की त्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला . या घटनेची खबर वडोदबाजार पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्ष संभाजी खाडे व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. कौशल्याचे प्रेत वर काढून उपजिल्हा रुग्णालय फुलंब्री येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तीस मयत घोषित केले. कौशल्याचा विवाह सोळा वर्षांपूर्वी २००४ मध्ये दिलीप गाडेकर यांच्या सोबत झाला होता. त्यांना दोन आपत्त्य असून मयत महिला कौशल्याबाई दिलीप गाडेकर यांचा भाऊ काकाजी माणिकराव कोलते राहणार टाकळी कोलते ता. फुलंब्री यांच्या फिर्यादीवरून भा द वि 306 323 498 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनी आरती जाधव या पुढील तपास करत आहेत.
Users Today : 20