प्रतिनीधी रवि मगर
बऱ्याच वर्षांपासून अनुसूचित जाती / जमातीच्या भूमिहीन, दारिद्र्य रेषेखालील लोकांनी उपजिविका भागविणेसाठी शासकिय गायरान जमिनीवर शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेले असून अद्यापपर्यंत कायम होण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी विनंती अर्ज, निवेदने व न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असताना सुध्या अनुसूचित जाती / जमातीच्या लोकांकडे उपजिवीकेचे दुसरे साधन नसल्यामुळे मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्प हा त्यांच्या ताब्यातील वहिती जमिनीवर न घेता तो विनावापर शासकिय अथवा पडीक अथवा खाजगी जमिनीवर घेण्यात यावा. या मागणीसाठी संस्थापक अध्यक्ष भन्ते कशप ली यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो अतिक्रमणधारक शेतकरी यांनी सामूहिक आत्मदहणाची प्रवानगी मिळावी म्हणून मागणी केली
यावेळी जिल्हाध्यक्ष शुध्दोधन गवई, गीतम क्षीरसागर, भिमराव क्षीरसागर, प्रल्हाद गवई, , तेजीलाल बच्छिरे, इंदुबाई नागडे, रमेश गवई, किसन सोनारे ईत्यादी मान्यवर उपस्थीत होते
Users Today : 22