बुलडाणा, दि. 15 : येत्या मान्सूनच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच पावसाळ्यातील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच येत्या काळात उष्णतेच्या लाटेबाबतही योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिले आहे.
मान्सून पूर्व आणि उष्णतेच्या लाटेबाबत शनिवार, दि. 13 मे रोजी आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते उपस्थित होते.
पावसाळ्याच्या दिवसात संभाव्य संपर्क तुटणाऱ्या गावाना पुरेशा प्रमाणात धान्य पुरवठा उपलब्ध करावा. आरोग्य विभागाने सतर्क राहून जलजन्य आजाराला आळा घालण्यासाठी आवश्यक औषधीसाठा उपलब्ध ठेवावा. वीज वितरण कंपनीने वी पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी दुरुस्ती पथके तैनात करावीत. रस्ता वाहून गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटतो. याबाबत बांधकाम विभागाने सतर्क राहून कार्यवाही करावी. सध्या सुरू असलेली पुलाची कामे दि. 30 मेपर्यंत तात्काळ पुर्ण करण्यात यावे. धोकादायक असलेल्या धरणाची दुरुस्ती मान्सून सुरु होण्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे.
अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकाची हानी झाल्यास कृषी विभागाकडून तत्परतेने कार्यवाही करावी. महावेदने बसविलेल्या मंडळनिहाय स्वयंचलित हवामान केंद्र सुस्थितीत असल्याची कृषी विभागाने खात्री करावी. तसेच नागरीकांनी दामिनी ॲपचा वापर करावा, आवाहन करण्यात आले
सद्यस्थितीत मे महिन्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनेचा आढावा घेण्यात आला. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची दक्षता घ्यावी, प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचाराची माहिती घेऊन उष्णतेच्या लाटेसंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याबाबतचे निर्देश देण्यात आले.
Users Today : 20