चिखली येथील अशोक वाटीका परिसरातील अवैध धंदे बंद करा- _वंचित बहुजन यूवा आघाड़ी चे रवि मगर यांची मागणी-
दी ७ अॉगष्ट रोजी चिखली तालुक्यातील वंचीत बहुजन यूवा आघाड़ी चे कार्यकर्ते रवि मगर , सोबत तालुका महासचीव राहुल साळवे , उपाध्यक्ष संजय जाधव
.निलेश अराख . राहुल कांबळे .संजय जाधव व बरेच से कार्यकर्ते यांनी चिखली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर अशोक वाटीका परिसरातील जोमात सुरु असलेले अवैध धंदे बघताच, चिखली पोलीस स्थानक चे ठानेदार संग्राम पाटील यांना वरली बंद करावी असे निवेदना द्वारे मागणी केली चिखली
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटीका परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, श्री
संकट मोचन हनुमान मंदीर मागील परिसर, मार्केट परिसर अशा अनेक ठिकाणी सर्रासपणे अवैध
वरली व्यवसाय जोमात सुरु असुन दररोज कोणत्या न कोणत्या कारणास्तव डॉ. बाबासाहेब
आंबेडकर वाटीका परिसरात अवैध वरली व्यवसायामुळे भांडणे चालु असतात. चिखली शहरामध्ये ठिकठिकाणी अवैध वरली व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सदर अवैध वरली व्यवसायाच्या
पायी शेकडो संसार उधवस्त होत आहेत कारण गोर-गरीब, मजुर, कष्टकरी हे अवैध वरली
व्यवसायाच्या आकड्यावर आपले मोल मजुरीचे पैसे लावतात परिणामी
गोरगरीब जनतेच्या कुटूंबाची उपासमारी होत आहे. त्याचप्रमाणे कास्तकार हे शेती मालाचे पैसे
अवैध वरली, यामध्ये बरबाद करतात. परिणामी कर्जबाजारी होवुन आत्महत्तेचा
विचार करतात,
तरी चिखली येथील ठानेदारांनी या कड़े लक्ष द्यावं असी अपेक्षा या निवेदना द्वारे केली आहे
Users Today : 47