परभणीत कोरडा दुष्काळ जाहीर करा; माजी आमदार विजय भांबळे यांची मागणी

Khozmaster
1 Min Read

परभणी : पाऊस कमी झाल्याने जिंतूर, सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन, तूर, हळद, कापूस व इतर सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाण्याअभावी सोयाबीन वाळून गेले आहे, तर कापूस, तूर, हळद पिकांनी माना टाकल्या आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने जिंतूर, सेलू तालुक्यात कोरडा जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बुधवारी, सहा सप्टेंबर रोजी भांबळे यांनी कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. बामणी, वाघी, हलवीरा आदी ठिकाणी भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ऐन फुलांच्या मोसमामध्ये पावसाअभावी सोयाबीन पिकांचे लाखो रुपयाचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहे. त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा, सोयाबीन व तुरीला हेक्टरी २५ हजार, कापसाला ३० हजार, हळद व फळबाग पिकास हेक्टरी ४० हजार रुपये अनुदान तातडीने मंजूर करावे; तसेच चालू वर्षाचा पीकविमा मंजूर करण्यात यावा. चोवीस तास वीजपुरवठा ठेवावा, शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या तोडण्यात येऊ नयेत. मागील वर्षीचा पीकविमा; तसेच २०१८ मधील काही मंडळातील अतिवृष्टीचे थकीत अनुदान तातडीने मंजूर करून वाटप करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्या मंजूर न झाल्यास शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आहे, असा इशारा भांबळे यांनी दिला आहे. या वेळी रामराव उबाळे, विश्वनाथ राठोड बाळासाहेब घुगे, मुरलीधर मते, मनोज थिटे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांनी केली आहे.

0 6 7 7 8 1
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11:10