‘तू माझा फोन फेकल्याने नुकसान’; विधिसंघर्षित तरुणाचा मुलाजवळ वाद, नंतर घडलं धक्कादायक कृत्य

Khozmaster
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर: मोबाइल फेकल्याच्या कारणावरून एका मुलाने १७ वर्षीय मुलाची मान आणि हात पकडून त्याला जमिनीवर आपटले. या घटनेत जखमी झालेला १७ वर्षीय मुलगा अकुल अभिषेक रॉय याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात एका विधिसंघर्षित बालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अकुलचे वडील अभिषेक रामेश्वर रॉय (४८, रा. रविकिरण अपार्टमेंट, श्रेयनगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार २४ ऑक्टोबरला दुपारी एकच्या दरम्यान अकुल खेळण्यासाठी बाहेर गेला. काही वेळाने सोसायटीतील मुलांनी अभिषेक रॉय यांना त्यांचा अकुल हा जखमीवर पडल्याची माहिती दिली. अभिषेक रॉय यांनी अकुलला विचारणा केली. त्या वेळी त्याने माझी पाठ दुखत असल्याचे सांगितले. अभिषेक रॉय त्यांनी अकुल याला उचलून एका खासगी रुग्णालयात दाखल केले.तो मित्राला भेटण्यासाठी झांबड इस्टेट कावेरी अपार्टमेंट येथे गेला होता. तेथे विधिसंघर्षग्रस्त मुलाने, ‘दसऱ्याच्या एक दिवस आधी तू माझा मोबाइल फोन फेकला होता. त्यामुळे मोबाइलचे नुकसान झाले आहे. त्याचे मला पैसे दे,’ असे अकुल याला सांगितले. त्यावर, ‘माझ्याकडे आता पैसे नाहीत, नंतर पैसे देतो,’ असे अकुलने सांगितले. त्या वेळी दोघांमध्ये वाद झाला. या वादात विधिसंघर्षग्रस्त मुलाने अकुल याची मान आणि हात धरून त्याला जमिनीवर आपटले. त्यात अकुल याच्या मानेचे हाड तुटले. उपचारादरम्यान २२ नोव्हेंबरला अकुल याचा मृत्यू झाला. त्यानंतर अकुलचे वडील अभिषेक यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून विधिसंघर्षग्रस्त मुलाच्या विरोधात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

0 9 3 7 3 4
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *