मंदिरातून घरी परततांना २१ वर्षीय युवकाची हत्या; तिघांना अटक, रामटेक गडमंदिर मार्गावरील घटना

Khozmaster
1 Min Read

नागपूर : रामटेकमधील गड मंदिर मार्गावर तिघांनी मारहाण करून २१ वर्षीय युवकाची हत्या केली. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे.
मनीष बंडू भारती (वय ३७), जितेंद्र गजेंद्र गिरी (वय २३) आणि सत्येंद्र गजेंद्र गिरी (वय २५, सर्व रा. अंबाडा वॉर्ड, रामटेक), अशी अटकेतील मारेकऱ्यांची, तर विवेक विश्वनाथ खोब्रागडे (रा. सीतापूर, देवलापार), असे मृताचे नाव आहे.  काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे शोभायात्रा बघून विवेक व त्याचा मित्र फैजान खान (रा. पवनी) हे दोघे मोटारसायकलने घरी जात होते. गड मंदिर मार्गावर मनीष, जितेंद्र आणि सत्येंद्र या तिघांनी त्यांना अडविले. ‘आमच्या मोटारसायकलला धडक का मारली’, अशी विचारणा करीत त्यांनी विवेक आणि फैजानला शिवीगाळ केली. विवेकने त्यांना शिवीगाळ करण्यास मनाई केल्याने तिघेही संतापले. त्यांनी विवेकला मारहाण केली. याचदरम्यान फैजानचा भाऊ तिथे आला. त्याने वाद सोडवित तिघांना दहा हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली. त्यानंतर ते घरी परतले.सकाळी विवेकचे वडील विश्वनाथ हे घरी आले असता त्यांना विवेक हा जखमी अवस्थेत दिसला. त्यांनी विवेकला कामठीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विश्वनाथ यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी खून, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.

 

0 9 3 7 3 5
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *