आजीच्या प्रयत्नांना यश; निवृत्तीवेतन पदरात पडले, ८३ वर्षीय महिलेने मानले मटाचे आभार

Khozmaster
2 Min Read

नागपूर: वर्धा येऊन नाशिकला स्थलांतरित झाल्यानंतर आपली पेन्शनही हस्तांतरित करावी, यासाठी वर्षभरापूर्वी अर्ज केला. मात्र नागपूर महालेखा कार्यालयाकडून झालेल्या चुकीमुळे हा अर्ज मुंबईऐवजी वर्धा येथील कार्यालयात जाऊन पडला. कुणी जबाबदारीही स्वीकारायला तयार नसल्याने वर्षभर मनस्ताप सहन करावा लागलेल्या ८३ वर्षीय आजीबाईंना आता न्याय मिळाला. हक्काची पेन्शन नाशिकला हस्तांतरित झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. ‘धन्यवाद मटा’, असे आभाराचे शब्द आपसूकच बाहेर पडले.

सध्या नाशिक येथे राहणाऱ्या शकुंतला सुरोसे यांचे कुटुंब निवृत्तीवेतन ११ महिन्यांपासून बंद असल्याने त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले. वृद्धापकाळासह अस्थमा आणि इतर व्याधींवरील उपचार कसा करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. ‘सरकार आपल्या दारी’सारखे उपक्रम शासनाकडून राबविले जात असताना एका ज्येष्ठ महिलेला होत असलेला हा मनस्ताप नक्कीच चीड आणणारा आहे, असा रोष निवृत्तीवेतन धारक महिलेकडून व्यक्त करण्यात आला. ‘मटा’च्या पाठपुराव्यानंतर महालेखाकार कार्यालयातील (एजी) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेत तातडीने प्रक्रियेला गती देण्याची सूचना केली. त्यामुळे वर्धा येथे चुकीने पाठविलेली कागदपत्रे पुन्हा नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाकडे पाठविण्यात आली. नागपुरातून मुंबई आणि आता नाशिकला ही कागदपत्रे पोहोचल्याने शकुंतला यांना आता नाशिक कोषागार कार्यालयाकडून निवृत्तीवेतन मिळणार आहे.वर्धा येथून मंडळ अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या त्र्यंबक सुरोसे यांचा ३१ मार्च २०२२ रोजी मृत्यू झाला. त्यानंतर पत्नी शकुंतला या नाशिक येथे मुलाकडे राहायला गेल्या. फॅमिली पेन्शन नाशिकला हस्तांतरित करावे, यासाठी त्यांनी वर्धा कोषागार कार्यालयाकडे २८ नोव्हेंबर २०२२ रोजी अर्ज केला होता. ३ डिसेंबरला हा अर्ज नागपूर एजी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. १७ एप्रिल २०२३ रोजी प्रकरण मंजूर झाले असून मुंबई एजी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे नागपूर कार्यालयाकडून सांगण्यात आले. तसे पत्रच शकुंतला यांना देण्यात आले. प्रकाश यांनी आपल्या थकलेल्या आईला घेऊन मुंबई कार्यालयात सहावेळा चकरा मारल्या. मात्र, आमच्याकडे पत्र आलेच नसल्याचे उत्तर देण्यात आले. अखेर हे प्रकरण एजी कार्यालयाच्या चुकीने वर्धा कार्यालयाला पाठविण्यात आल्याचा शोध लागला. मात्र, झालेली चूक सुधारण्यासाठीही कुणी तयार नव्हते. ‘मटा’ने हा मुद्दा उचलून धरला
0 9 3 7 8 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *