यंदाचा साखर हंगाम ‘कडवट’, गाळप-उत्पादन अन् उताराही घटला, साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढली

Khozmaster
2 Min Read

कोल्हापूर : यंदाचा साखर कारखान्यांचा गळित हंगाम कडवट होणार असल्याचे स्पष्ट संकेत पहिल्या महिन्यात झालेल्या उत्पादनाच्या आकडेवारीवरून मिळत आहेत. सुरू झालेल्या कारखान्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली असून, ऊसगाळप आणि उतारा यामध्येही घट झाली आहे. तीन महिनेच कारखाने सुरू राहणार असल्याने साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढणार आहेत.

राज्यात १ नोव्हेंबरपासून साखर हंगाम सुरू झाला. गतवर्षीच्या तुलनेत १६ कारखाने सुरू झाले नाहीत. मुळात यंदा ऊसाची लागवड कमी आहे. शिवाय अनियमित पावसामुळे वाढीवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळे ऊस कमी असल्याने यंदा केवळ तीन महिने कारखाने सुरू राहण्याची अपेक्षा आहे. यंदा साधारणत: ९७० लाख मे. टन ऊस उपलब्ध होईल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के साखर उत्पादन कमी होणार आहे.

हंगाम सुरू होऊन महिना पूर्ण झाला. पहिल्या महिन्यात गाळप आणि उत्पादन या दोन्हींमध्ये घट झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. गतवर्षी ८.६९ असलेला उतारा यंदा ७.८३पर्यंत खाली घसरला आहे. याचा फटका कारखान्यांबरोबरच शेतकऱ्यांनाही बसणार आहे. अशातच भावासाठी पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे बराच ऊस कर्नाटकात गेला. त्याचाही दणका महाराष्ट्रातील साखर उदयोगाला बसणार आहे.

यंदा कारखाने १५० दिवसांऐवजी केवळ ९० दिवसच चालणार आहेत. यामुळे उत्पादनखर्च वाढणार आहे. मागील उतारा गृहित धरून एफआरपी देण्याची घोषणा झाली आहे. उतारा घटल्यास हा मुद्दा वादग्रस्त होण्याची चिन्हे आहेत.साखर हंमाम तुलनात्मक- चालू हंगाम- मागील हंगाम

सुरू कारखाने-१७२-१८८

ऊस गाळप-१६१.८६ लाख मे.टन-२२६ लाख मे. टन

साखर उत्पादन-१२६.७५ लाख क्विं.-१९६.४७ लाख क्विं.

उतारा-७.८३-८.६९सुरू असलेले कारखाने

शहर संख्या

कोल्हापूर २८

पुणे २७

सोलापूर ४२

अहमदनगर २३

छत्रपती संभाजीनगर २२

0 9 3 7 8 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *