पुरोगामी महाराष्ट्र अल्पवयीन गुन्हेगारीत देशात अव्वल; सर्वाधिक गुन्हे ‘या’ दोन शहरात, कोणत्या घटना अधिक?

Khozmaster
2 Min Read

 पुणे : देशात गुन्हेगारीसाठी अल्पवयीन मुलांचा सर्वाधिक वापर महाराष्ट्रात होत असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आली आहे. कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून गुन्हे घडवून आणण्याची टोळ्यांची पद्धत संपूर्ण राज्यभर दिसून येत आहे.मागील वर्षांत महाराष्ट्रात अल्पवयीन मुलांवर चार हजार ४०६ गुन्हे दाखल असून, अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीत पुरोगामी महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. यातील सर्वाधिक गुन्हे अनुक्रमे मुंबई (३०२) आणि पुणे (२४८) या शहरांत दाखल आहेत.

मागील दोन वर्षांत पुण्यात कोयताधारी टोळक्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे आव्हान निर्माण केले असताना आता गुन्हेगारीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर वाढल्याने या टोळ्यांवर लगाम घालणे पोलिसांसाठी तापदायक ठरू लागले आहे. शहरांमध्ये दहशत पसरवणाऱ्या कोयता गँगमधील अल्पवयीन मुलांचा वाढता वावर सुशिक्षित शहरासाठी धोक्याची घंटा आहे.

१५ ते ३० या वयोगटातील सराईत गुन्हेगारांकडे कोयत्यानंतर आता गावठी कट्टे सहज आढळत आहेत. शहरात तीन वर्षांत सुमारे २२४ बेकायदा पिस्तुले आणि हजारपेक्षा जास्त जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. शहरातील टोळक्यांना मध्य प्रदेशातून ४० ते ५० हजार रुपयांत गावठी कट्टे सहज उपलब्ध होत असून, अल्पवयीन मुलांकडून हत्यारांचा उघडपणे वापर सुरू झाला आहे. मिठाई व्यावसायिकाने काजू कतलीचे पैसे मागितल्याने अल्पवयीन मुलांनी गोळीबार केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी शहरात घडली होती.मुले धोकादायक वळणावर

वेगाने विकसित होत असलेल्या पुण्याच्या उपनगरांत त्याच गतीने गुन्हेगारी वाढत आहे. संघटित गुन्हेगारीसोबत खून, चोरी, दरोडा, महिला अत्याचार, अल्पवयीन मुलांवर अत्याचार, सायबर असे गुन्हे; तसेच मुली आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा व टोळ्यांचा सहभाग ही चिंतेची बाब झाली आहे. अल्पवयीन मुलांकडे गावठी कट्टे सापडू लागल्याने या मुलांचा प्रवास धोकादायक वळणावर आला आहे.अल्पवयीन मुलांकडून घडलेले गुन्हे

महाराष्ट्र ४,४०६
मध्य प्रदेश ३,७९५
राजस्थान ३,०६३
तमिळनाडू २,६०७
छत्तीसगढ २,३५६

राज्यात अल्पवयीन मुलांवर दाखल गुन्हे

मुंबई ३०२

पुणे २४८

– शहरात अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या सुमारे हजार घटना.
– सुमारे तीन हजार जण बेपत्ता.

– १५ ते ३० या वयोगटातील सराईत गुन्हेगारांकडे कोयत्यानंतर आता गावठी कट्टे.

0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *