सांगली : विजेची वाढती मागणी ध्यानात घेऊन वीज वितरण जाळे बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आरडीएसएस योजनेतून सांगली जिल्ह्यात २५५० कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ, जत, विटा यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वीज प्रश्न सुटतील, अशी माहिती एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी नुकतीच दिली.
Users Today : 29