दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी चौकशीच्या हालचाली, ठाकरे गटाने थेट शाहांवर आरोप असलेलं प्रकरण उकरलं

Khozmaster
3 Min Read

नागपूर : उपराजधानीत न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणाची एसआयटी लावावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.सत्ताधारी पक्षातील काही आमदारांकडून सातत्याने दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांची एसआयटीद्वारे चौकशीची मागणी होत आहे. प्रत्यक्षात या प्रकरणी अनेक चौकशा झाल्या आहेत. त्यात काहीही आढळलेले नाही. दिशा सॅलियन यांच्या कुटुंबीयांचीदेखील काही तक्रार नाही. चौकशीच करायची असेल तर नागपूरात न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांच्याही कुटुंबीयांची या प्रकरणात काही तक्रार नाही. मात्र, त्यांच्या मृत्यूची एसआयटी करून सत्य बाहेर यावे, असे अंबादास दानवे म्हणाले.                                                                                        अडीच वर्षात तुम्ही काय केले?                                                                                              दिशा सॅलियनप्रकरणी सरकारने एसआयटी गठीत केली आहे. त्यापूर्वी अडीच वर्षे तुमची सत्ता होती. तेव्हा तुम्ही न्यायमूर्ती लोया प्रकरणी एसआयटी का लावली नाही, असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या घरी झालेल्या पार्टीची माहिती अनिल परब यांनी दिली होती. तसेच या प्रकरणी मी जे आरोप करतोय, त्यावरील चौकशीसाठी मलादेखील बोलवावे. जेणेकरून दुधका दुध और पानीका पानी होईल, असेदेखील आमदार नितेश राणे म्हणाले.

मुंबई महापालिकेवरील चौकशी राजकीय दृष्टीतून: सचिन अहिर

नागपूर : मुंबई महानगरपालिकेच्या मागील २५ वर्षातील अर्थिक व्यवहारांची चौकशी लावणे दुर्दैवी आहे. त्या २५ वर्षांतील २० वर्षे जे आमच्यासोबत होते, तेच आता चौकशीवर चर्चा करताहेत. आगामी निवडणुका लक्षात ठेवून ही चौकशी करण्यात येत आहे. ही कारवाई राजकीय दृष्टीकोनातून आहे, असे शिवसेनेचे (ठाकरे गट) विधान परिषदेचे सदस्य सचिन अहिर विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.ज्यावेळी मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जात असताना सत्ताधारी पक्षातील आमदार ठाणे, कल्याणची चौकशी बघताहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही यापूर्वी लावलेला आहे. त्याची साधी कॅगद्वारे पण चौकशी होत नाहीये. एकीकडे इतर महापालिकेतील भ्रष्टाचारावर कॅगची चौकशी करू द्यायची नाही आणि दुसरीकडे मुंबई महापालिकेची चौकशी करायची, असा प्रकार सुरू आहे. ज्या आयुक्तांच्या कार्यकाळात या सर्व गोष्टी झाल्यात त्यांनाच प्रशासक म्हणून ठेवायचे. पाहिजे त्या गोष्टी करून घ्यायच्या. असलेल्या ठेवीतून शहर स्वच्छ करत असल्याचे दाखवायचे, असा प्रकार सुरू आहे, असे आमदार सचिन अहिर म्हणाले.

 

0 9 3 8 5 4
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *