Pune Crime:कारचा धक्का लागल्याने वाद, टोळक्याचा तरुणावर हल्ला, भाच्यासमोर मामाचा निर्घृण खून

Khozmaster
2 Min Read

 हडपसर: कारचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून दहा जणांच्या टोळक्याने कारचालकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना हडपसर परिसरातील शेवाळवाडी येथे मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक संजय भोसले (वय ३०, रा. शेवाळवाडी, मांजरी, पुणे-सोलापूर रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे.या प्रकरणी विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट, सचिन सकट यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिषेक याचा भाचा अथर्व दादासाहेब साबळे (वय १८, रा. ऑर्चिड रेसिडन्सी, शेवाळवाडी, मांजरी) याने फिर्याद दिली आहे. शेवाळवाडी महादेवाच्या मंदिरासमोर ही घटना घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि त्याचा भाचा अथर्व कारमधून फुरसुंगी-चंदवाडी रस्त्यावरून मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास जात होते. त्या ठिकाणी विलास सकट आणि कैलास सकट यांची किरकोळ भांडणे सुरू होती. थांबलेल्या कारला त्यांचा धक्का लागला. ‘भांडणाचा राग माझ्या गाडीवर काढू नका,’ असे अभिषेकने सांगितले. अभिषेक याच्या कारचा धक्का लागल्याने आरोपी विलास सकट याने त्याच्याशी वाद घातला.आरोपी सकट आणि साथीदारांनी अभिषेक आणि अथर्वला शिवीगाळ केली. टोळक्याने लोखंडी धारदार शस्त्र आणि दगडाने जबर मारहाण करून अभिषेकला गंभीर जखमी केले. अथर्वने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या अभिषेकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सहायक पोलिस निरीक्षक नानासाहेब जाधव आणि पथक पसार झालेल्या आरोपींचा शोध घेत आहे.

0 9 3 7 4 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *