मुखी राम अन् ९ वर्ष विनामोबदला काम, ७० वर्षीय आजींकडून समर्थांच्या सज्जनगडाच्या स्वच्छतेचा वसा

Khozmaster
3 Min Read

सातारा: सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर एक आजी गेली नऊ वर्षे गडावरील पायऱ्याची साफसफाई करत आहेत. हे त्यांचं काम अविरत विना मोबदला सेवाभावी वृत्तीने सुरू आहे आणि हे काम करत असताना त्यांना कोणताही संकोच वाटत नाही. समोरून येणाऱ्या पर्यटकाला श्रीराम म्हणून स्वागत करण्याची त्यांची पद्धत आहे. त्यांच्या मुखात अखंड श्रीरामाचा जप जपला जातो. साधारण 70 वर्षांच्या आजी अठरा वर्षाच्या तरुणीला लाजवेल असा तिचा चालण्याचा रुबाब आहे. थोड्या थकल्यात मात्र अजूनही अंगात जिद्द आहे सेवाभावी वृत्तीची.शारदा सर्जेराव मोरे असं त्यांचं नाव आहे. अकरा बारा वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं अपघातात निधन झालं अन् जिकडे रोजगार मिळेल तिकडे जाणे हाच त्यांच्याकडे पर्याय राहिला. शेवटी त्या रोजगारानिमित्ताने साताऱ्याजवळील मानेवाडी गावात भाड्याची खोली घेऊन राहू लागल्या. त्यांचं मूळ गाव मेढा जवळील कुसुंबी-काळोशी येथील आहे. त्यामुळे कुसुंबीची काळुबाई हे त्यांचं दैवत. त्या नियमित कुसुंबीच्या देवीला सेवा करण्यासाठी जात असत. हीच त्यांची सल मनात घोळू लागली. त्यामुळे आजी साताऱ्यापासून जवळच असलेल्या सज्जनगडावर गेल्या.नऊ वर्षांपूर्वी आजी गडावर गेल्यानंतर तेथे साफसफाई करू लागल्या. त्यासाठी त्यांनी सज्जनगड संस्थांकडून केरसुणी घेऊन मी पायऱ्या साफ करत जाईन असं त्यांनी सांगून टाकलं. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनीही सेवा अखंडित सुरू केली. आपण एसटीतून उतरल्यानंतर वाहन तळापासून ते महाद्वारपर्यंत साधारण अडीचशे पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या आजी साधारण दोन ते तीन दिवसात स्वच्छ करत असतात. जास्त अस्वच्छता असेल तर आठवडा लागतो. प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा असेल तर आजी गोळा करून त्या कचरापेटी टाकत असतात.शारदा आजी या मोबदल्यात काहीही घेत नाहीत अन तशी मागणीही करत नाहीत. सज्जनगडावर येणाऱ्या पर्यटकांनी स्वखुशीने दिलेली मदत त्या स्वीकारतात त्यावरच त्यांचा संसार उदरनिर्वाह चालतो. सज्जनगडावर नेहमीच येणाऱ्या पर्यटकांची आजींची चांगलीच मैत्री आहे. अगदी आपल्या जवळचाच नातेवाईक आहे अशा रीतीने त्या चौकशी करतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये आजींचं काम अविरत सुरू आहे. गडाच्या पायऱ्या साफ करणे म्हणजे समर्थांची सेवाच केली असल्याचे आजी वारंवार सांगतात. जीवात जीव असेपर्यंत हे माझे गडाची सेवा कायम राहणार आहे असे आजी आवर्जून सांगतात. ही सेवा केल्याने आणखी काम करण्यास बळ मिळतं असे आजी सांगतातसज्जनगडावरील संस्थानकडून आजींना कधी करण्यात आली नाही. पावसाळ्यात जाण्याची अडचण असेल तर संस्थांची गाडी त्यांना अनेकदा मदत करत असते. आजींच्या मनात कोणाविषयी हेवादेवा, क्लेश नाही की कोणाशी भांडण नाही. आजी गेले नऊ वर्ष मिळेल त्या गाडीने गडावर येऊन आपली सेवा रुजू करत असतात. पर्यटकांनी किती घाण करू द्या मी त्याला खंबीर आहे. जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत या पायऱ्यांची साफसफाई माझ्याकडून अविरत सुरू राहील ही खात्री मात्र आजी प्रत्येक वेळी देत असतात.

0 9 3 8 6 1
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *