Devendra Fadnavis : ‘बरच सत्य हे माझ्याजवळ आहे’, देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना सूचक इशारा

Khozmaster
2 Min Read

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याशी समझौता करण्यासाठी माणूस पाठवला होता, असा मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ते सर्व कल्पित गोष्टी बोलत आहेत. बरच सत्य हे माझ्याजवळ आहे, योग्य वेळी मी ते बाहेर काढेन” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “आज त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सनसनी पसरवायची आहे, मात्र ज्यावेळेस मी सत्य बाहेर काढेन, त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे याच्यावर जास्त काही मी बोलत नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“खरं म्हणजे, या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे, त्या घटनेमध्ये हे सरकारमध्ये होते. त्यांचं सरकार त्या ठिकाणी होतं, त्यांच्याच काळात सगळा तो फॉर्मचा आणि शंभर कोटीचा घोटाळा झाला आणि त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवले या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. काळजी करू नका, योग्यवेळी मी बाहेर काढेन” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अनिल देशमुख यांच्यावर काय आरोप झालेले?

अनिल देशमुख यांचा काल वाढदिवस होता. त्या निमित्ताने त्यांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी आयोजित कार्यक्रमात अनिल देशमुख यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याशी समझौता करण्यासाठी माणूस पाठवला होता हा गौप्यस्फोट केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते. त्यांच्यावर तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी कथित 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना मंत्रीपद सोडाव लागलेलं. या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना एकवर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावं लागलं.

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *