पहिली सही बळीराजासाठी!; पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारला, ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार ‘निधी’

Khozmaster
1 Min Read

वी दिल्ली : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (दि.९) तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता देशात मोदी सरकार ३.० सुरू झाले आहे. शपथ घेतल्यानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे.

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर जवळपास १६ तासांनी नरेंद्र मोदींनी या कार्यकाळातील पहिल्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पीएम किसान निधी सन्मान योजनेशी संबंधित फाइलवर स्वाक्षरी केली. पीएम किसान निधी सन्मान योजनेच्या १७ व्या हप्त्याशी संबंधित फाइलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वाक्षरी केली आहे. या योजनेंतर्गत जवळपास २० हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. ज्याचा फायदा देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

यावेळी, आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे समर्पित आहे. त्यामुळे स्वाक्षरी करण्यात येणारी पहिली फाईल ही शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित असावी, हे उचित होते. आगामी काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी अधिकाधिक काम करण्याची आमची इच्छा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

0 9 4 7 6 5
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *