नांदुरा प्रतिनिधी. राज्य सरकारने 2022 पासून शेतकरी लाभार्थ्यांना गहू तांदूळ वाटप बंद करण्यात आले व शेतकरी रेशनधारकांना राज्य सरकारने सबसिडी वाटप जाहीर करण्यात आले २ वर्ष नंतर राज्य सरकार सबसिडी (पैसे) वाटप न केल्याने दि .13 जून रोजी चांदुर बिस्वा येथील अंबिका फाउंडेशनचे अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांनी तहसीलदार यांचा निवेदन दिले निवेदन नमूद आहे कि. शेतकरी रेशन कार्ड 2022 पासून गहू व तांदुळा पासून वंचित आहे राज्य सरकारने शेतकरी रेशनधारकना गहू तांदुळाचे सबसिडी पैसे वाटप न केल्याने शेतकरी २ वर्षे पासून वंचित आहे तरी सबसिडी (पैसे) वाटप करण्यात यावे . व सोयाबीन धारक शेतकऱ्यांना भावफलक प्रतिक्विंटल १००० रु अनुदान जाहीर करून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावे. रेशनकार्ड शेतकऱ्यांना सबसिडी देण्यात यावी व सोयाबीनधारक शेतकऱ्यांनी अनुदान जाहीर करून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावे . असे म्हटले आहे
Users Today : 25