जळगाव : जिल्ह्यात मुळ रहिवास मात्र शेती शेजारच्या जिल्ह्यात असलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने कर्ज (Pik karj) देवू नये. या शेतकऱ्यांना अल्पमुदत पिककर्ज (Crop Loan) दिल्यास व त्यातील काही शेतकरी सभासद थकबाकी झाल्यास १०१ ची वसुली प्रकरणे त्या संबधित तालुका उपनिबंधकाकडून प्राप्त होत नाहीत. त्यामुळे सहकारी कर्जाची वसुली करता येत नाही अशी कारणं देत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नाशिक यांनी कर्जास प्रतिबंध केल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. यात मार्ग काढण्यासाठी जिल्हा बँकेने सहकार मंत्र्यांना साकडे घातले आहे. जळगाव जिल्ह्यालगत औरंगाबाद, बुलढाणा, नाशिक व धुळे या जिल्ह्याच्या गावात क्षेत्र असणाऱ्या शेतकरी सभासदांचा मुळ रहिवास हा जळगांव जिल्ह्यामध्ये आहे. त्यांना बँक यापूर्वी वि.का.सह.संस्थांमार्फत कर्जपुरवठा करीत होते. परंतु वि.का. सह.संस्था खूप मोठ्या प्रमाणात अनिष्ट तफावतमध्ये गेल्याने बँकेने ५० लाखाच्यावर अनिष्ट तफावत असलेल्या संस्थेच्या सभासदांना थेट कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने बँक थेट कर्जपुरवठा करीत आहे. बँकेने २७ जून अखेर ३३ हजार ६०० सभासदांना २०४ कोटी १५ लाखाचा थेट कर्जपुरवठा केलेला आहे व विकीसोमार्फत १ लाख २० हजार ५४३ शेतकऱ्यांना ७०७ कोटी ३७ लाख असे एकूण ९११ कोटी ५२ लाखाचे कर्जवाटप केलेले आहे. पिकविम्यासाठीही अडचणी बँकेचे क्षेत्र जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने जिल्ह्याबाहेरी क्षेत्र असलेल्या शेतकरी सभासदांना कर्ज देवू नये. अल्पमुदत पिककर्ज दिल्यास थकबाकी झाल्यास १०१ ची रिकव्हरी प्रकरणे संबधित तालुका उपनिबंधकाकडून प्राप्त होत नाहीत. त्यामुळे सहकारी कर्जाची वसुली करता येत नाही. तसेच पिकविमा कंपनी बदल झाल्यामुळे त्यांचा पंचनामा करण्यास अडचणी निर्माण होतात. त्यांचा पिकविमा घेता येत नाही. अतीवृष्टी, गारपीट या सारख्या शासकीय अनुदानाचा लाभ देता येत नाही. असे असतानाही बँकेने या शेतकऱ्यांना कर्ज वाटपाची तयारी दर्शविली आहे. यासंदर्भात जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन तसे पत्र त्यांना दिले आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. संबंधित जिल्ह्याच्या उपनिबंधकांची परवानगी घेऊन आम्ही शेतकऱ्यांना कर्ज वाटपास तयार आहोत. शेतकरी हितासाठी शासनाने कर्जपुरवठा करण्यास व थकबाकीदार झाल्यास त्याचा १०१ चा दाखला संबधित सहाय्यक निबंधक यांनी देण्यास हरकत नाही असे आदेश निर्गमित करावे, अशी विनंती सहकार मंत्र्यांकडे केली आहे. -संजय पवार, चेअरमन, जिल्हा बँक, जळगाव

Khozmaster
3 Min Read

कोल्हापूर : विशाळगड (ता. शाहूवाडी) येथील किल्ल्यावर व गजापूर आणि मुसलमानवाडीतील विशिष्ट समाजाच्या घरावर दगडफेक, हल्ले करून जाळपोळ केल्याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांत सुमारे ६० जणांवर सोमवारी गुन्हे दाखल झाले.

हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेज, छायाचित्रे आणि चित्रीकरण पाहून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. त्यातील २१ जणांना अटक केली. या जाळपोळीत ५६ कुटुंबांचे प्रापंचिक साहित्याचे तसेच ७ कार, ३ मोटारसायकली मिळून सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सकाळी गडावर गेली आणि त्यांनी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सुरू केली. त्यामध्ये १० खातेदारांच्या भाड्याने दिलेल्या खोल्या, दुकानांची अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. दरम्यान, रविवारच्या घटनेस सर्वांनीच पोलिस व जिल्हा प्रशासनास जबाबदार धरले. त्यांनी पुरेशी दक्षता न घेतल्यानेच ही घटना घडल्याचा आरोपही काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती यांनी केला. त्यांनी या घटनेमुळे आपल्याला तीव्र वेदना झाल्याचे म्हटले आहे.

नुकसानग्रस्तांना आधार देण्यासाठी ते आज मंगळवारी गडावर जाऊन आजूबाजूच्या गावांतील लोकांना भेटणार आहेत. सायंकाळी कोल्हापुरात झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीतही या घटनेचा निषेध करून आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कुणी सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्यास तो वेळीच रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले.

राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी पीडितग्रस्तांची घेतली भेट

या दंगलीस माजी खासदार संभाजीराजे हेच जबाबदार असल्याने त्यांनाच अटक करावी, अशी मागणी कोल्हापुरातील मुस्लीम बोर्डिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केली. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बदली करावी, अशी मागणीही जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदन देऊन केली. मुस्लीम समाजाने या घटनेचा दसरा चौकात निदर्शने करून जोरदार निषेध केला. या हल्ल्यातील संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान यांनी कोल्हापुरात केली. त्यांनी सायंकाळी विशाळगडावर जाऊन पीडितग्रस्तांची भेट घेतली.

यापूर्वी अतिक्रमण काढण्यावर कोणाचा दबाव होता?

विशाळगडावर रविवारी जी घटना घडली, त्याला सरकार, जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करतानाच, मी गेल्या दीड वर्षापासून अतिक्रमण काढा म्हणून मागे लागलो होतो, त्याची दखल घेतली नाही. शिवभक्तांचा उद्रेक झाल्यानंतर तुम्ही अतिक्रमण काढण्याचे आदेश देत आहात. मग यापूर्वी ते काढण्यावर कोणाचा दबाव होता? असा सवाल माजी खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. त्यानंतर ते स्वत:हून शाहूवाडी पोलिसांत हजर झाले परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

संभाजीराजेंवर गुन्हा दाखल नाही

शिवभक्तांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा मला अटक करा, या मागणीसाठी संभाजीराजे यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात चार तास ठाण मांडले होते. मात्र, पोलिस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही, असे सांगितले.

तीन दिवसांची कोठडी

याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी ६० जणांवर गुन्हे दाखल केले. २१ जणांनी पोलिसांनी अटक करून शाहूवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

0 8 9 4 6 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *