भाज्या स्टीम करून खाव्यात की उकडून, काय जास्त फायदेशीर? डायटिशिअनने दिलं उत्तर

Khozmaster
1 Min Read

 आपल्या रोजच्या आहारात भाज्यांना मुख्य स्थान असतं. वेगवेगळ्या भाज्यांमधून शरीराला अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स, खनिज आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. जे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.

वेगवेगळ्या भाज्यांचं सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. तसेच शरीराचं नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सही नष्ट होतात. मात्र, भाज्यांबाबत नेहमीच अनेकांना असा प्रश्न पडतो की, भाज्या कशा पद्धतीने खाल्ल्या तर त्यातून जास्त फायदे मिळतात? भाज्या शिवजण्याची योग्य पद्धत कोणती आहे? असाही प्रश्न अनेकांना पडतो. भाज्या स्टीम करून खाव्या की उकडून खाव्यात? हा तर मुख्य प्रश्न आहे. अशात न्यूट्रिशनिस्ट श्वेता पांचाल यांनी याचं उत्तर दिलं आहे.

भाज्या खाण्याची योग्य पद्धत

डायटिशिअन श्वेता पांचाल यांनी सांगितलं की, “जेव्हा तुम्ही भाजी बनवण्यासाठी किंवा एखादं सूप बनवण्यासाठी भाज्या उकडता तेव्हा भाजीतील पोषक तत्व पाण्यात मिक्स होतात. जर तुम्ही या पाण्याचा वापर एखाद्या वेगळ्या पदार्थात करत असाल तर चांगले पोषक तत्व मिळू शकतात. उकडलेल्या भाज्यांचा फायदा असा मिळतो की, अनेक भाज्यांमध्ये ओक्सालेट्स असतात आणि जेव्हा आपण भाज्या उकडून खातो तेव्हा हे ओक्सालेट्स ८० टक्के कमी होतात”.

0 9 4 9 6 9
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *