शेगाव प्रतिनिधी ;-
शेगाव ते बाळापूर मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून संपूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली आहे. या मार्गावरून अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यांतून येणाऱ्या प्रवाशांसह श्री गजानन महाराज व श्री महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
फक्त ८ किमीच्या अंतरात शेकडो खड्डे
जवळा–पळसखेड या फक्त ८ किलोमीटरच्या पट्ट्यात रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे.
रस्ता अनेक ठिकाणी उखडलेला
शेकडो ठिकाणी खोल खड्डे
पावसाळ्यात तात्पुरती चुरी टाकून काम भागवले
रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांसाठी मोठा धोका
या मार्गावर अकोला–पुणे दरम्यान धावणाऱ्या शेकडो ट्रॅव्हल्सची वर्दळ असते. तसेच श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक या मार्गाचा वापर करतात. आनंद सागर, आनंद विहार, विठू माझा लेकुरवाळा, तसेच शेगाव शहरापासून अवघ्या ४ किमी अंतरावर असलेले उदयोन्मुख श्री महालक्ष्मी मंदिर या स्थळांवर जाण्यासाठीही हाच प्रमुख रस्ता आहे.
पुढील मोठी चिंता — ८ फेब्रुवारी २०२६ प्रगट दिन सोहळा
श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त ८ फेब्रुवारी २०२६ रोजी लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर शेगाव–बाळापूर रस्त्याची दुरावस्था दूर न झाल्यास वाहतूक कोंडी, अपघात आणि व्यवस्थापनाचे मोठे आव्हान निर्माण होणार आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर उदासीनतेचे आरोप
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या रस्त्याबाबत—
लोकप्रतिनिधी
जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी उदासीनता दाखवल्याचा आरोप नागरिक करत आहेत
भाविक व स्थानिकांनी रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्याची मागणी केली असून, प्रगट दिनापूर्वी तरी दुरुस्ती होईल का, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
शेगाव–बाळापूर रस्ता खड्डेमय; प्रवासी आणि भाविकांच्या जीवाला धोका — दुरुस्तीची तातडीची मागणी
0
9
5
5
3
7
Users Today : 39
Leave a comment