पाडळी शिंदे प्रतिनिधी :
परिसरात शेकडो रोही अर्थात Nilgai (नीलगाय) यांच्या कळपांमुळे शेतकऱ्यांची रब्बी व उन्हाळी पिके धोक्यात आली आहेत. मोठमोठ्या कळपांनी शेतात घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने शेतकरी त्रस्त झाला असून रात्रंदिवस शेतात पहारा देण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांचे प्रयत्न अपुरे
नीलगायींचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत आहेत—
बॅटरी भोंगे
कुत्र्यांचा वापर
लाईट व बल्ब व्यवस्था
शेताभोवती तार-दोरी
झटका मशीन
शेकोटी करून पहारा
मात्र, नीलगायींच्या वाढत्या कळपांपुढे या उपाययोजना अपुऱ्या ठरत असून पिकांचे नुकसान थांबत नाही.
पाण्याची टंचाई आणि वाढती चिंता
पाझर तलावातील पाणी अंतिम टप्प्यात असताना नीलगायींच्या टोळ्या शेतांमध्ये येत असल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. येणाऱ्या खरीप हंगामातही हा उपद्रव वाढण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
प्रशासनाकडे मागणी
लोकप्रतिनिधी व वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना करून नीलगायींचा बंदोबस्त करावा, अशी आर्त मागणी शेतकरी करीत आहेत. अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
रब्बी-उन्हाळी पिके धोक्यात; नीलगायींचा वाढता उपद्रव
0
9
3
3
2
1
Users Today : 10
Leave a comment