चिखली प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासनाबाबत करण्यात आलेल्या मागणीला यश मिळाल्यानंतर चिखली व परिसरातील सरपंचांनी कृतज्ञताभाव व्यक्त करत सत्कार केला. महायुती सरकारने घेतलेल्या या ग्रामहिताच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “गावांचा सर्वांगीण विकास आणि ग्रामपंचायतींचे सक्षम प्रशासन हीच आपली प्राथमिकता आहे. लोकप्रतिनिधींना जबाबदारी दिल्यास पारदर्शक, उत्तरदायी व परिणामकारक कारभार शक्य होतो.”
ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सतीश पाटील भुतेकर, मेहकर तालुका अध्यक्ष अरुण दळवी, अमडापूरचे सरपंच संजय गवई, अंत्री (खेडेकर)चे सरपंच सचिन खेडेकर, मेरा खुर्दचे सरपंच रमेश अवचार, आमखेडचे सरपंच जगन्नाथ वाघ, किन्होळ्याचे सरपंच वसंतराव जाधव, पेठचे सरपंच विष्णू शेळके, टाकरखेड मुसलमानचे सरपंच ज्ञानेश्वर डहाके, बोरी (मेहकर)चे सरपंच अनंतराव चनखोरे, धोत्रा भनगोजीचे सरपंच गुलाबसिंग सोनारे यांच्यासह अनेक सरपंच उपस्थित होते.
Users Today : 47