मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याला महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती पासून कायमच काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने सावत्रपणाची वागणूक दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन ७० वर्षे सत्तेत असणारे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार छत्रपतींच्या जन्मदात्या राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यालाच कायम विसरत आले.. ही वस्तुस्थिती असून मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील स्वातंत्र्य पूर्वीच्या काळापासून प्रलंबित प्रश्नांना व समस्यांना वंचित महाराष्ट्राचे तारणहार उपमुख्यमंत्री, विदर्भाचे भूमिपुत्र देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मार्गी लावले आहे.
त्यांनी आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ४ महत्वाच्या आणि प्रलंबित प्रकल्पांचा समावेश केला आहे.
कदाचित महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एवढा बहुमान मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याला मिळाला असेल.
१) खामगाव-जालना रेल्वेमार्ग
२) सिंदखेडराजा-शेगाव चारपदरी महामार्ग
३) बुलढाणा वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता
४) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संत्रा प्रक्रिया उद्योग
बुलढाणा जिल्ह्याच्या परिपूर्ण विकासाला भरारी देणारा ७० वर्षांचा अनुशेष भरून काढणारा तसेच बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या या चार प्रकल्पांची घोषणा मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केली. सोबतच मी दि 26/2/2023रोजी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सह्याद्री अतिथी गृह येथे त्यांची भेट घेऊन धनगर समाजासाठी भरीव तरतूद आणि वडार समाजाच्या आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीला स्वीकारून दोन्ही समाजांच्या मागण्या पूर्ण केल्या. तसेच लिंगायत समाजासाठी सुद्धा महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने गुरव समाजासाठी संत काशीबा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करून सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदाच केल्याने ना देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानावे तितके कमीच, तरीही एका शेतकऱ्याची मुलगी म्हणून तसेच एक लोकप्रतिनिधी या नात्याने मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे संपूर्ण मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासीयांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानते!
*बुलडाणा जिल्ह्याला भरभरून गोड दिल्याबद्दल आ सौ श्वेता ताई महाले यांनी ना देवेंद्र फडणवीस यांचे तोंड केले गोड*
मुंबई: उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये या जिल्ह्याला भरभरून गोड बातम्या दिल्याने आ सौ श्र्वेताताई महाले यांनी त्यांचे विधानसभेमध्ये पेढा भरवून तोंड गोड करून आभार व्यक्त केले .
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याला महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती पासून कायमच काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने सावत्रपणाची वागणूक दिली.
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याला महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती पासून कायमच काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने सावत्रपणाची वागणूक दिली.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन ७० वर्षे सत्तेत असणारे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार छत्रपतींच्या जन्मदात्या राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यालाच कायम विसरत आले.. ही वस्तुस्थिती असून मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील स्वातंत्र्य पूर्वीच्या काळापासून प्रलंबित प्रश्नांना व समस्यांना वंचित महाराष्ट्राचे तारणहार उपमुख्यमंत्री, विदर्भाचे भूमिपुत्र देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मार्गी लावले आहे.
त्यांनी आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ४ महत्वाच्या आणि प्रलंबित प्रकल्पांचा समावेश केला आहे.
कदाचित महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एवढा बहुमान मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याला मिळाला असेल.
१) खामगाव-जालना रेल्वेमार्ग
२) सिंदखेडराजा-शेगाव चारपदरी महामार्ग
३) बुलढाणा वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता
४) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संत्रा प्रक्रिया उद्योग
बुलढाणा जिल्ह्याच्या परिपूर्ण विकासाला भरारी देणारा ७० वर्षांचा अनुशेष भरून काढणारा तसेच बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या या चार प्रकल्पांची घोषणा मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केली. सोबतच मी दि 26/2/2023रोजी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सह्याद्री अतिथी गृह येथे त्यांची भेट घेऊन धनगर समाजासाठी भरीव तरतूद आणि वडार समाजाच्या आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीला स्वीकारून दोन्ही समाजांच्या मागण्या पूर्ण केल्या. तसेच लिंगायत समाजासाठी सुद्धा महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने गुरव समाजासाठी संत काशीबा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करून सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदाच केल्याने ना देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानावे तितके कमीच, तरीही एका शेतकऱ्याची मुलगी म्हणून तसेच एक लोकप्रतिनिधी या नात्याने मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे संपूर्ण मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासीयांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानते!
*बुलडाणा जिल्ह्याला भरभरून गोड दिल्याबद्दल आ सौ श्वेता ताई महाले यांनी ना देवेंद्र फडणवीस यांचे तोंड केले गोड*
मुंबई: उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये या जिल्ह्याला भरभरून गोड बातम्या दिल्याने आ सौ श्र्वेताताई महाले यांनी त्यांचे विधानसभेमध्ये पेढा भरवून तोंड गोड करून आभार व्यक्त केले .
Users Today : 48