शिरुर, आंबेगावच्या राजकारणात दिग्गज नेत्यांची ताकद; पूर्वा वळसेंचे दौरे वाढल्याने राजकारण बदलणार

Khozmaster
2 Min Read

पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी काही दिवसात जाहीर होण्याची चिन्हे आता निर्माण होऊ लागली आहेत. लोकसभेसाठी शिरुर लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. अजित पवार गटाने यावर दावा केल्यानंतर मात्र यात प्रचंड राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या यांचे या मतदारसंघात दौरे वाढू लागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात वरिष्ठांकडून पूर्वा वळसे यांचेवर कोणती जबाबदारी सोपवली जाणार, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.राज्यात भाजप शिंदे सरकार सोबत अजित पवार देखील सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीत देखील दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद या निवडणुकीचे गणित मतदार संघाच्या स्थानिक पातळीवर राहु शकते. त्यात आंबेगाव तालुक्याचे राजकारण हे दिलीप वळसे पाटील यांच्या भोवती फिरते. त्यामुळे या निवडणुकीची पुढची दिशा देखील तेच ठरवणार असून त्या उद्देशातून त्यांना पूर्वा वळसे पाटील यांना सक्रिय होण्याचे संकेत दिले असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.दिलीप वळसे पाटील यांच्या बरोबरीने माजी खासदार आणि शिंदे शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांची देखील ताकद मोठी आहे. तीनवेळा त्यांनी लोकसभेच्या माध्यमातून त्यांनी मतदारांच्या मनावर अधिराज्य केले आहे. मात्र त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेची तयारी सुरू केली आहे. पूर्वा वळसे पाटील यांच्य्यामागे देखील आढळराव पाटील संपूर्ण ताकदीनिशी उभे राहतील अशा घडामोडी आता घडू लागल्या आहेत. पूर्वा वळसे पाटील यांचे मतदार संघात वाढलेले दौरे येणाऱ्या काळात आंबेगावचे राजकारण बदलवणाऱ्या आहेत. त्यामुळे पूर्वा वळसे पाटील यांच्या मागे अनेक दिग्गज नेत्यांनी फौज उभी राहणार का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र, पूर्वा यांच्या मतदार संघातील दौऱ्याने राजकारण बदलणार हे नक्की.

0 9 3 8 3 6
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *